गाड्या काढा आणि आंदोलनाला भेट द्या, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. हे आवाहन करत असतानाच जरांगेंनी २९ तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांच्या उपस्थितीत 123 गावांतील प्रमुख मराठा बांधव आणि मराठा सेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर जरांगेंनी सविस्तर माहिती दिली.