Headlines

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रकोप;महापालिका ॲक्शन मोडवर , नोटिसांचा डोस


Nashik Dengue Cases: पावसाळा म्हंटला की आजारपण डोक वर काढत.तापांची लागण हेण्यास चालू होते. या तापाच्या विळख्यात नाशिक मात्र चांगलच फसलयं नाशिकमध्ये डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत आहे त्यामुळे नाशिक महापालिका आता चांगल्याच अॅक्शन मोडवर आहे.

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रकोप
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक: पावसाने विश्रांती घेतली असली,तरी शहरात डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर महापालिकेचा मलेरिया विभाग अॅक्शन मोड वर आला आहे.या प्रकरणी शासकीय कार्यालयांसह एकूण २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

२०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा

डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने महापालिकेच्या मलेरिया विभागाने ऑगस्ट जिल्हा परिषद , नाशिकरोड रेल्वे स्टेशन, सामानगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन यांसह आठ शासकीय कार्यालये आणि एकूण २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ.रवींद्र ढोले यांनी दिली. दरवर्षी पावसाळ्यात साथरोगांची प्रादुर्भाव वेगाने वाढतो.

नाशिकमध्ये डेंग्यूचे थैमान

डेंग्यू, चिकुनगुन्या,मलेरिय, स्वाइन फ्लू यांसारख्या कीटकजन्य आजारांची लागण होते. यंदाही नाशिकमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. रिकामे प्लॉट,बांधकामस्थळे ,बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने ,छतावरील पाण्याच्या टाक्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांची निर्मिती होते.

Maharashtra TimesRiddhi Thakkar : ब्रेकचा इश्यू, तरी मुंबईकर रिद्धीने हट्टाने ‘अव्हेन्जर’ चालवली, बाईक रॅली आयोजकांचा दावा, ब्लाईंड स्पॉटवर ट्रकने चिरडलं

असा वाढला प्रादुर्भाव

जूनपर्यंत डेंग्यूची रुग्णसंख्या आटोक्यात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ तर जूनमध्ये जेमतेम ८ रुग्ण होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळेडेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली.त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला.जुलै महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले.

धुरफवारणी कागदावर?

आरोग्य विभागाकडून शहरभर धूरफवारणी, फॉगिंग आणि अळीनाशक फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष धूरफवारणी कागदावरच होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.धूरफवारणीचा ठेका संपुष्टात आल्यानंतर ठेकेदारांना महिानाभराची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्यांच्याकडून कागदावरच धूरफवारणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डेंग्यूमुक्त नाशिकासाठी सुरू केलेल्या मोहिमेलाच ब्रेक लागल्याची टीका होत आहे.

Maharashtra TimesSnakebite: सर्पदंश नोंद आता बंधनकारक; ‘अधिसूचित आजार’ जाहीर करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय

ऑगस्टमध्ये १४ दिवसांतच २९ नवे रुग्ण

ऑगस्ट महिना सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भाव दुपटीने वाढला. ऑगस्टच्या पहिल्या १४ दिवसांतच डेंग्यूचे २९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या डेंग्यू रुग्णांची संख्या ८२ वर गेली. स्वाइन फ्लूमुळे तिघांचा बळी गेला आहे. त्यामुळे मलेरिया विभागाने आक्रमक भूमिका घेत घराघरांत तपासणी आणि अळी शोधमोहीम हाती घेतली आहे.या मोहीमेत शासकीय कार्यालयांसह बांधकाम साइटवर डेंग्यूच्या अळ्या पथकांना आढळून आल्या. त्यामुळे आतापर्यंत २०८ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात जुलै महिन्यात १२० तर ऑगस्टमध्ये ८८ आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा