शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासाठी शरद पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तर यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. पवारांच्या भेटीपासून शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदेंनी जोरदार टीका केली आहे. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदेंनी टोला लगावला आहे.