मुंबई:’लव्ह लग्न लोचा’ लोकप्रिय मालिका व चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिता जाधव सध्या चर्चेत आहे. मोठ्या ब्रेकनंतर ती पुन्हा सोशल मीडियावर तसंच उद्योगक्षेत्रात सक्रिय झाली आहे. लग्नानंतर रुचितानं सिनेइंडस्ट्रीतून ठरवून ब्रेक घेतला. या सगळ्याबद्दल तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय.
म्हणून अरेंज मॅरेज केलं मी एका राजकीय घरात लहानाची मोठी झाले. घरी सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींसाठी मोकळीक होती , कोणतीही बंधनं नव्हती करिअर निवडीसाठी स्वातंत्र्य होतं. फक्त लग्न करताना मुलगा घरचे शोधणार हे मात्र नक्की होतं. त्यामुळं प्रेमात पडूनही काही होणार नाही, हे माहिती होतं. त्याप्रमाणे मी अरेंज मॅरेज केलं. लग्नासाठी हे ७२ वं स्थळ होतं असंही रुचितानं सांगितलं.
मॅट्रिमोनीवरून ठरलं लग्न तर मॅट्रिमोनीवर नोंदणी केली होती. त्यावर दोघांचेही प्रोफाइल एकमेकांना दिसले, त्यातून ओळख झाली. यानंतर आनंदने मला एकदा फोन केला होता, की तुला लग्न करायचं नसेल, घरचे जबरदस्ती करत असतील तर सांग,मी नंतर कॉल नाही करणार…पण तसं काही नव्हतं, त्यामुळे मी त्याला आपण बोलू शकतो असं म्हटलं. या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. जवळजवळ ६ ते ७ महिने एकमेकांना समजून घेतल्यानंतर, डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी लग्न करण्याचा पक्का निर्णय घेतला. यानंतर लग्न झालं, लग्नानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलो, असंही रुचितानं सांगितलं.
Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं?
म्हणून इंडस्ट्रीतून घेतला ब्रेक टिपीकल ९६ कुळी मराठा घरात माझं लग्न झालं. लग्नानंतर मी माझ्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. असं नाहीत की घरचे सपोर्टीव्ह नाहीत, पण मी कुटुंब निवडलं. शूटिंगच्या वेळा, प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाइफ मॅनेज करणं मला अवघडही जात होतं. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचंही रुचिता सांगते.
मला हुकुमाचा एक्का भेटला तर अरेंज मॅरेज करताना भीती वाटली नाही का? याबद्दल विचारलं असताा रुचिता म्हणाली की, लग्न हा एक जुगार असतो. मला माझ्या आयुष्यात हुकुमाचा एक्का भेटला आहे, मी जिंकलेय, असं मला वाटतं.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा