![]()
भारतात विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ रिक्तझाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस सहामहिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यासपोटनिवडणूक घेतली जाते. सध्या बिहारमधीलबांकीपूर, मध्य प्रदेशातील दतिया आणि गुजरातमधीलमंझलपूर या तीन विधानसभा मतदारसंघांतपोटनिवडणुका प्रस्तावित आहेत. यापैकी मंझलपूरकडेतुलनेने कमी लक्ष असले, तरी दतिया आणि बांकीपूर यादोन मतदारसंघांतील राजकीय घडामोडींनी विशेष चर्चा रंगवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व कायम असल्याने ही उत्सुकता निकालानंतरअल्पकालीन ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकडेवारीही यालाच दुजोरा देते. गेल्या पाच वर्षांत विविध राज्यांतील 153 विधानसभा पोटनिवडणुकांपैकी 119 जागांवर सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीने विजय मिळवला. म्हणजेच त्यांचा यशाचा दर 78 टक्के राहिला. विरोधीपक्ष किंवा आघाड्यांना केवळ 34 जागा मिळाल्या. म्हणजेच त्यांचा यशाचा दर 22 टक्के राहिला. गेल्या पाचवर्षांपासून हा कल कायम आहे. सध्याच्या पोटनिवडणुकांपूर्वी 2026 मध्ये सात जागांवरपोटनिवडणुका झाल्या होत्या. सर्व जागांवर सत्ताधारीपक्ष किंवा आघाडी विजयी झाली होती. 2025 मध्ये 15जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांपैकी 9 जागासत्ताधारी पक्षाने तर 6 जागा विरोधकांनी जिंकल्या.2024 मध्ये 86 जागांवरील पोटनिवडणुकांत 69 जागासत्ताधारी पक्ष किंवा आघाडीने जिंकल्या तरविरोधकांना 17 जागांवर समाधान मानावे लागले. 2023 मध्ये 17 पैकी 12 जागांवर सत्ताधारी पक्ष विजयीझाला, तर विरोधकांना 5 जागा मिळाल्या. 2022 मध्ये28 पैकी 22 जागा सत्ताधारी पक्षाने जिंकल्या, तरविरोधकांना केवळ 6 जागा मिळाल्या. दतिया आणि बांकीपूर येथील पोटनिवडणुकांनी विशेषराजकीय उत्सुकता निर्माण केली आहे. भाजपनेबांकीपूरमध्ये उमेदवार बदलला तर मध्य प्रदेशचे माजीगृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतियातून उमेदवारीनाकारण्यात आल्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी नाराजीव्यक्त केली. मिश्रा हे राज्यातील प्रभावी नेते मानले जातअसतानाही पक्षाने त्यांच्या ऐवजी आशुतोष तिवारी यांनाउमेदवारी दिली. बांकीपूरमध्ये भाजपने सुरुवातीला अभिषेक कुमार सिन्हायांना उमेदवार घोषित केले होते. मात्र त्यांनी कौटुंबिककारणास्तव निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतरपक्षाने नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली. बांकीपूरमतदारसंघ आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांचा हा पहिलाचनिवडणूक सामना आहे. 2025 मधील बिहार विधानसभानिवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रथमच प्रवेश केला होता.मात्र, त्या वेळी प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढलेनव्हते. पक्षाला केवळ 3.5 टक्के मते मिळाली होतीआणि एकही जागा जिंकता आली नव्हती. दतिया आणि बांकीपूर या मतदारसंघांची चर्चाविरोधकांनी बलाढ्य उमेदवार दिल्यामुळे किंवा अत्यंतचुरशीची लढत होणार असल्यामुळे नाही. या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीची चर्चेमागे इतरराजकीय कारणे आहेत. भाजपमध्ये काही प्रमाणातअंतर्गत अस्वस्थता आणि हालचाली सुरू असल्याचेचित्र दिसत आहे. सामान्यपणे भाजपच्या बाबतीत अशीपरिस्थिती दुर्मिळ मानली जाते. भाजपमध्ये अशा प्रकारचे चित्र दिसत नाही. परंतुपोटनिवडणुकीत ते समोर येत आहे. त्यामुळेच या दोन्हीपोटनिवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्षलागले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या पाच वर्षांत देशभरात झालेल्या 153विधानसभा पोटनिवडणुकांमधून एकस्पष्ट कल समोर आला आहे. सरासरीभारतीय मतदार उमेदवारापेक्षा पक्षालाप्राधान्य देऊन मतदान करतो. लहानराज्यांत उमेदवाराची वैयक्तिकलोकप्रियता महत्त्वाची ठरू शकते.
Source link
संजय कुमार यांचा कॉलम:राजकारणात पोटनिवडणुकांचा कल आता नेमका कशाकडे?
