Headlines

विजांच्या कडकडाटासह पावसाचं पुनरागमन होणार, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात धो-धो बरसणार; हवामान खात्याचा अंदाज| Maharashtra Times


Weather Update: गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली असताना १५ जुलैपासून पुन्हा सुरुवात झाली. १६ जुलै रोजी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

16 जुलै हवामान
मुंबई: जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबई-ठाण्यात तापमान वाढू लागलं होतं. पण १५ जुलै रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह काही भागांमध्ये पावसाचं पुनार्गमन झालं. वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मुसळधार पाऊस झाला नसला तरी वातावरणात गारवा पसरला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलै ते २१ जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परंतु, मुसळधार पावसासाठी महाराष्ट्राताला २० तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. १६ जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे हे जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वी हवामान विभागाच्या उपग्रहांमधील छायाचित्रांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या ७० टक्के भागावरून मान्सूचे ढग गायब झालेले दिसून येत होते. पण आता हे ढग परतले असून हळूहळू पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरूवारी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

मुंबईमध्ये आज पावसाचा जोर कायम असला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. १६ जुलै रोजी कोकणात पाऊस होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसं असेल?

पुणे जिल्ह्यातही आज पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाचा जोर वाढला नसून आज हलक्या सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसासाठी २० जुलैची प्रतीक्षा करावी लागेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील हवामान

गुरूवारी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्ये स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असताना आज जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.

Maharashtra TimesMumbai Local Crime: मध्यरात्री लोकलमध्ये जागेवरून वाद, वादाचा भयंकर शेवट; पश्चिमनंतर मध्य रेल्वेवर धक्कादायक प्रकार

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये १६ ते २१ जुलैदरम्यान पावसाचं पुनर्रागमन होणार आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सरी बरसतील. दरम्यान, हिंगोली, नांदेज, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी असण्याची शक्यता आहे.

विदर्भातील हवामान कसं असेल?

विदर्भात बुधवारपासून हवामान बदलायला सुरुवात झाली आहे. अनेक दिवस पावसाचा जोर ओसरल्यानंतर १६ जुलैपासून बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पण नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये १७ जुलैनंतर मुसळधार पावसाला सुरुवात होईल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा