Headlines

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कोणी टचही करू शकत नाही; आर अश्विन असं का म्हणाला?


रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान आर अश्विनने दोन्ही दिग्गजांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लॉर्ड्समध्ये रोहितच्या शतकानंतर आता त्याच्या भवितव्याबाबतच्या चर्चांना आणखी वेगळं वळण मिळालं आहे.

r ashwin big statement on rohit sharma virat kohli
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही दिग्गज २०२७चा वनडे विश्वचषक खेळणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतही मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, असा दावा करण्यात आला होता. मात्र या सामन्यात रोहितने १३८ धावांची शानदार खेळी करत टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिले. आता भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने रोहित आणि विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

‘रोहित-विराटला कोणी टचही करू शकत नाही’

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने म्हटलं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली जोपर्यंत स्वतः खेळण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, तोपर्यंत त्यांना कोणीही संघातून बाहेर करू शकत नाही. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास १२ हजार धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळणं सोपं नाही, असं अश्विनचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या दोन्ही दिग्गजांना खेळताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मैदानात येतात. त्यामुळे त्यांना संघातून बाहेर केल्यास प्रेक्षकांच्या संख्येवरही परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा अश्विनने मांडला.

Maharashtra TimesIndia vs Zimbabwe 1st T20I : वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार; भारत-झिम्बाब्वे सामना लाइव्ह कुठे पाहायचा?

रोहितवर उपस्थित झाले होते प्रश्न

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितला केवळ ११ आणि २६ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातच रोहित २०२७च्या विश्वचषकाच्या योजनांचा भाग नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र लॉर्ड्समध्ये रोहितने ११० चेंडूंमध्ये १३८ धावांची तुफानी खेळी करत या चर्चांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Maharashtra TimesSikandar Raza : वैभवला फ्लॉप म्हणू नका! झिम्बाबेचा कॅप्टन सिकंदर महत्त्वाचं बोलला; झिम्बाबे दौऱ्याआधी सूर्यवंशीबद्दल काय म्हणाला?

‘माझं काम रन बनवणं’

या शानदार खेळीनंतर रोहितने आपल्या भवितव्याबाबतही भाष्य केलं. ‘माझं काम रन बनवणं आहे. मी देशासाठी ते करत राहीन. पदार्पण केल्यापासून मला हेच करण्यास सांगितलं जात आहे आणि मी पुढेही हेच करत राहणार आहे,’ असं रोहितने स्पष्ट केलं. त्यामुळे आता रोहित-विराटच्या भवितव्याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून, आर अश्विनच्या वक्तव्याने या चर्चेला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.