Headlines

भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहायचे? वेळ बदलली, नवीन चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण


IND vs ZIM T20 Series : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सामने नेहमीच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळेत सुरू होणार असून, टीव्हीवर नवीन चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहता येतील आणि ओटीटीवर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार, जाणून घ्या.

India vs Zimbabwe match time, Unite 8 Sports TV
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या मालिकेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामने नेहमीच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळी खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेचं टीव्हीवर थेट प्रक्षेपण नेहमीच्या स्पोर्ट्स चॅनेलवर होणार नाही. सामने कुठे आणि किती वाजता पाहता येतील, जाणून घ्या.

२३, २५ आणि २६ जुलैला सामने

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २३ जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २५ जुलैला, तर तिसरा सामना २६ जुलैला खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने अवघ्या काही दिवसांच्या अंतराने होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला सलग सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असेल.

दुपारी ४.३० वाजता सुरू होणार सामना

या मालिकेतील सामन्यांच्या वेळेतही मोठा बदल करण्यात आला आहे. भारतात टी-२० सामने साधारणपणे संध्याकाळी किंवा रात्री खेळवले जातात. मात्र, भारत-झिम्बाब्वे मालिकेतील सामने दुपारी सुरू होणार आहेत. मालिकेतील प्रत्येक सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता होईल. त्यानंतर ४.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांसारखे खेळाडू दुपारी ४.३० वाजल्यापासून मैदानात खेळताना दिसणार आहेत.

Maharashtra TimesTeam India : आयर्लंडनंतर इंग्लंडने धडा शिकवला, आता झिम्बाब्वेची धमकी; टीम इंडियाला मोठं आव्हान, मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर काय म्हणाला?

ना स्टार स्पोर्ट्स, ना सोनी, ना जिओ हॉटस्टार

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेचं थेट प्रक्षेपण नेहमीच्या स्पोर्ट्स चॅनेलवर होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. स्टार स्पोर्ट्स किंवा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हे सामने पाहता येणार नाहीत. तसंच, जिओ हॉटस्टारवरही या मालिकेचं थेट प्रक्षेपण होणार नाही. या मालिकेसाठी एका नव्या स्पोर्ट्स चॅनेलची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सामने पाहणाऱ्या चाहत्यांना यावेळी वेगळ्या चॅनेलवर जावं लागणार आहे.

नवीन चॅनेलवर फ्रीमध्ये पाहता येणार सामने

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेचं टीव्हीवर थेट प्रक्षेपण युनाइट ८ स्पोर्ट्स टीव्ही या चॅनेलवर होणार आहे. या चॅनेलवर सामने पाहण्यासाठी चाहत्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे टीव्हीवर टीम इंडियाचे सामने पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी हा एक पर्याय असेल.

Maharashtra TimesLalit Modi : ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतणार! न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाला?

मोबाइल आणि लॅपटॉपवरही पाहता येणार

ज्या चाहत्यांना टीव्हीऐवजी मोबाइल, स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर सामने पाहायचे आहेत, त्यांच्यासाठी फॅनकोड हा पर्याय उपलब्ध असेल. फॅनकोडच्या माध्यमातून या मालिकेतील सामन्यांचं ओटीटीवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

दरम्यान, या मालिकेत वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यावर विशेष लक्ष असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध चांगली कामगिरी करून मालिकेत विजय मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा