Headlines

देवघरातील देव भांडी चमकण्यासाठी साखरेची ही ट्रिक वापराल तर थक्क व्हाल,न घासता ही चमकतील भांडी पिवळी पेस्ट करेल कमाल – how to clean copper and brass utensils in 10 minutes with sugar salt solution


तांबे आणि पितळेची भांडी काळपट झाली असली तरी घरच्या घरी तयार केलेल्या नैसर्गिक पेस्टने ती सहज स्वच्छ करता येतात. फक्त एक चमचा साखर आणि काही साध्या स्वयंपाकघरातील साहित्याच्या मदतीने भांडी तसेच देवांच्या मूर्ती नव्यासारख्या चमकदार होतात. हा उपाय कमी खर्चिक, सुरक्षित आणि सणासुदीच्या काळात विशेष उपयुक्त आहे.

Copper brass cleaning paste
Copper brass cleaning paste
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तांबे आणि पितळेच्या भांड्यांना विशेष महत्त्व आहे. पूजा-अर्चा, सण-उत्सव, तसेच दैनंदिन वापरासाठी अनेक घरांमध्ये तांब्या-पितळेची भांडी जपून ठेवली जातात. मात्र, ही भांडी काही दिवस वापरली नाहीत किंवा योग्य प्रकारे स्वच्छ केली नाहीत तर त्यांच्यावर काळपट थर, डाग, तेलकटपणा आणि ऑक्सिडेशनमुळे मळ जमा होतो. विशेषतः दसरा, दिवाळी किंवा इतर सणांच्या वेळी ही भांडी स्वच्छ करण्यासाठी अनेकजण बाजारातील महागडी पितांबरी किंवा रासायनिक क्लिनर वापरतात. परंतु घरातच उपलब्ध असलेल्या काही साध्या पदार्थांपासून अतिशय कमी खर्चात आणि प्रभावी अशी नैसर्गिक पेस्ट तयार करून तांबे-पितळेची भांडी नव्यासारखी चमकवता येतात. या घरगुती पेस्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती तयार करण्यासाठी फक्त एक चमचा साखरेसह काही स्वयंपाकघरातील साहित्य लागते. ही पेस्ट केवळ भांडीच नव्हे तर देवांच्या पितळ किंवा तांब्याच्या मूर्ती, पंचारती, ताम्हण, ताट आणि इतर पूजेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठीही उपयुक्त ठरते.(फोटो सौजन्य :- @Dnyaneshwari’s recipe)

पेस्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

पेस्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

ही पेस्ट बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते.
१ चमचा साखर
२ ते ३ चमचे लिंबू सत्त्व (सायट्रिक अॅसिड)
१ चमचा मीठ
अर्धा चमचा हळद
गव्हाच्या पिठाचे चाळण किंवा थोडे गव्हाचे पीठ (पेस्ट घट्ट करण्यासाठी)
आवश्यकतेनुसार थोडे पाणी

प्रत्येक घटकाचे महत्त्व

प्रत्येक घटकाचे महत्त्व
  • या पेस्टमधील प्रत्येक घटक विशिष्ट काम करतो.
  • साखर ही भांड्यांवरील मळ सैल करण्यास मदत करते आणि भांड्यांना चमक आणण्यास उपयोगी ठरते.
  • लिंबू सत्त्व (सायट्रिक अॅसिड) हे तांबे आणि पितळेवरील काळपट थर, ऑक्सिडेशन आणि डाग काढण्यासाठी अत्यंत प्रभावी असते.
  • मीठ हे सौम्य घर्षण निर्माण करून चिकट मळ काढण्यास मदत करते.
  • हळद मध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे स्वच्छतेसोबतच भांड्यांची स्वच्छता टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • गव्हाच्या पिठाचे चाळण किंवा पीठ हे पेस्टला घट्टपणा देते, त्यामुळे ती भांड्यांवर सहज लावता येते आणि वाहून जात नाही.

पेस्ट तयार करण्याची पद्धत

पेस्ट तयार करण्याची पद्धत

एका स्वच्छ भांड्यात प्रथम लिंबू सत्त्व घ्यावे. त्यामध्ये साखर, मीठ आणि हळद मिसळावी. नंतर त्यात गव्हाच्या पिठाचे चाळण किंवा थोडे गव्हाचे पीठ घालावे. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करावी. पेस्ट फार पातळ किंवा फार घट्ट नसावी.

तांबे पितळेची भांडी स्वच्छ करण्याची पद्धत

भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम भांड्यावरची धूळ किंवा सैल मळ काढून टाकावा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट संपूर्ण भांड्यावर लावावी. दोन ते पाच मिनिटे ती तसेच राहू द्यावी. नंतर हाताने किंवा मऊ स्पंजच्या साहाय्याने हलक्या हाताने चोळावे.काही वेळातच भांड्यावरील काळपट थर निघू लागतो. त्यानंतर स्वच्छ पाण्याने भांडे धुऊन कोरड्या कापडाने पुसावे. भांडे लगेचच नव्यासारखे चमकू लागते.

आतून आणि बाहेरून स्वच्छता

आतून आणि बाहेरून स्वच्छता

जर भांडे आतून काळे झाले असेल तर त्यामध्ये थोडी पेस्ट आणि पाणी घालावे. हे मिश्रण संपूर्ण भांड्याच्या आतील भागात फिरवावे. काही मिनिटांनी हलक्या हाताने घासून स्वच्छ धुवावे. त्यामुळे आतील भागातील डागही सहज निघून जातात.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा