Headlines

‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Sunetra Pawar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत पक्ष संघटनेत उदासीनता आली आहे. पुन्हा एकदा सक्रिय व्हा. संघटना अधिक मजबूत करा. सक्रिय नसलेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना बदला, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी कोअर कमिटीतील नेत्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, एसआयआरसाठी पुन्हा मुदतवाढ दिल्यानंतर त्याबाबत अधिक दक्षतेने काम करायचे असेल, बीएलओच्या नेमणुकीबाबत असेल, या संदर्भात व्यापक अर्थाने चर्चा झाली. ते करत असताना 27 सप्टेंबरला नाशिक येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं एक राज्यव्यापी शिबिर घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाची घडामोड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आणखी महत्त्वाची घडामोड घडल्याची माहिती मिळत आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात याआधी बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता कोअर कमिटीच्या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या टीमने सादरीकरण केल्याची माहिती समोर येत आहे.

या सादरीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत विविध सूचना असल्याची माहिती मिळत आहे. इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय रणनीती ठरवली पाहिजे, तसेच देशातलं जेन-झी आंदोलनाने बदललेलं राजकीय समीकरणे याबाबत या बैठकीत सादरकरण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

27 सप्टेंबरला महत्त्वाच्या घडामोडी घडणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी काळाती रणनीतीबाबत चर्चा झाली. यानंतर आता राज्यव्यापी शिबिर येत्या 27 सप्टेंबरला नाशिकमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या राज्यव्यापी शिबिरकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण या राज्यव्यापी शिबिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Maharashtra TimesEknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्यविशेष म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असणार आहे. कारण थेट पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्वांसमोर रणीनीती सांगणार आहेत. या रणनीतीतून आगामी काळातील राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा