छत्तीसगडमधील पाचजण नेपाळमध्ये फिरायला गेले होते. सकाळी ते एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबले. त्यावेळी तिथे त्यांना अचानक आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेल्याची माहिकी मिळाली. जर ते १० – १५ मिनिटे आधी गेले असते तर ते पुरातच अडकले असते. परंतु एका चहाच्या ब्रेकमुळे त्यांचा जीव वाचला. त्यावेळी या सर्वांनी एका उंच ठिकाणी रात्र घालवली. परिस्थिती पूर्वरत झाल्यावर ते सुखरूप मूळ गावी परतले, तेव्हा त्यांनी हा सर्व थरार सांगितला.
Nepal Flood : माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, त्याला सोडून एकटी कशी जगू? महाप्रलयाचे इशारे, नेपाळी महिलेचा घराबाहेर पडण्यास इन्कार
नारायण सेन, दिनेश ओझा, प्रेम सिंह जगत, यतेंद्र प्रकाश और दिनेश सिंह ठाकुर हे ५ मित्र छत्तीसगडच्या रायपूर येथील ‘माना कॅम्प’ भागातील रहिवासी आहे. या सर्वांचे वय ५० ते ६० वर्ष आहे. रायपूर येथून २१ ऑगस्टला आपल्या प्रवासाला सुरुवात केली. ते पशुपतिनाथ मंदिर, मनोकामना मंदिर सह अनेक पर्यटन स्थळांवर जाणार होते. बुधवारी २६ ऑगस्टला हे ५ मित्र चहा पिण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते धाडींग जिल्ह्यातील मलेखु कसबे येथेल एका हॉटेलमध्ये थांबले. त्यांनी चहासाठी घेतलेला ब्रेक त्यांच्यासाठी जीवदान ठरला आणि ५ मित्रांचा जीव वाचला.
सांगितला दोन रात्रींचा थरार
५३ वर्षीय नारायण सेन म्हणाले, “२६ ऑगस्टला जेव्हा अचानक पूर आला तेव्हा आम्ही चहासाठी थांबलो होतो, हे आमचे नशीबच, जर आम्ही १०-१५ मिनिटे आधी निघालो असतो तर कदाचित आम्ही त्यात अडकलो असतो. जिथे आम्ही चहासाठी थांबलो ते हॉटेल एका भारतीयाचे होते. त्यांनीही आम्हाला खूप मदत केली आणि जेवणही दिले.”
दिनेश सिंह ठाकुर (५५ वर्ष) यांनी सांगितले की, जेव्हा पूर आला तेव्हा ते आणि त्यांचे मित्र पशुपतिनाथ मंदिरापासून फक्त ५० किमी दूर होते. हॉटेलमध्ये आम्ही चहा पीत असतानाच आम्हाला पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळाली. नदीकाठची गावे, इमारती, कार्यालये आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचे ऐकायला मिळाले. नक्की काय झाले हे पाहण्यासाठी आम्ही त्रिशूळ नदीकाठी पोहोचलो. तेव्हा आम्ही जे पहिले त्याचे शब्दात सांगणे कठीण आहे.
दिनेश ओझने सांगितले की, या पुरानंतरची दृश्ये आयुष्यभरात आठवणीत राहणार. अनेक लोक आपल्या कुटुंबीयांच्या शोधात इकडे तिकडे भटकत होतीत. आम्ही कारमध्ये झोपण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा पूर येणार या भीतीमुळे आम्हाला झोप लागलीच नाही. आम्ही अखेर सुखरूप घरी पोहोचलो याचा आम्हाला आनंद आहे.
इंटरनेटच्या मदतीने संपर्कांत
पुराचे रौद्ररूप पाहून त्यांनी उंच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. भाड्याने घेतलेल्या कारमध्ये रात्र काढली. तिथे वीज आणि पाणी नव्हते, मात्र स्थानिक लोकांनी आणि प्रशासनाने त्यांना मदत केली. हे सगळे इंटरनेटच्या मदतीने आपल्या कुटुंबाशी संपर्कात होते. भारतीय सरकारच्या हेल्पलाइनवर त्यांनी आपले लोकेशन पाठवले होते. २८ ऑगस्टला ते रायपूरला परत येण्यासाठी निघाले आणि सुखरूप घरी पोहोचले.
तैनात महिला सुरक्षा रक्षकांनी बांधली राखी
हे पाच मित्र नेपाळ येथून राखी पौर्णिमेनंतर परतणार होते. त्यामुळे त्यांच्या बहिणींनी सर्वांना आधीच राख्या दिल्या होत्या. या राख्या तिथे तैनात असलेल्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर बांधल्या. हा क्षण त्यांच्यासाठी सगळ्यात भावुक करणारा होता.
मृतांचा आकडा वाढला
बुधवारी भोटेकोशी आणि त्रिशूली नदीला अचानक आलेल्या महापुराने अनेकांचा मृत्यू झाला. या महापुरात आतापर्यंत ७३४ शव सापडलेले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. युद्धपातळीवर बचाव पथक बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत. २ हजारांपेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. तिबेटमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नेपाळमध्ये बेपत्ता नागिकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे. यासोबतच चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

