उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीएच्या म्हणण्यानुसार कारभार चालवू नये असं सांगत असतानाच क्षीरसागर यांनी आपल्याला कुठलेही निमंत्रण येत नसल्याचे सांगितले. तसेच अजित पवारांनी जनतेला दिलेला शब्द पाळला पाहिजे, अशी तक्रार त्यांनी केली.