Headlines

yavatmal district three farmers ends life during diwali festival 2025; यवतमाळ हादरले! दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल


Yavatmal Farmer Ends Life: मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग व त्यातच शेतमालाच्या पडलेल्या किमतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

farmer ends life
farmer ends life(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या झाल्याचे सोमवारी समोर आले. कळंब, बाभूळगाव आणि दारव्हा तालुक्यातील या घटनांमुळे शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कळंब तालुक्यातील तिरझडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष वसंत ठुसे (३५) यांनी १८ ऑक्टोबरला सायंकाळी गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकांचे कर्ज वाढत असल्याने ते सतत काळजीत राहत होते. यातच त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Maharashtra Timesअत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेकडे तगादा, संतापात आरोपीचा वस्तऱ्याने गळा चिरला; 21 वर्षांपूर्वीच्या घटनेचा कोर्टात धक्कादायक निकाल लागला
दुसरी घटना बाभूळगाव तालुक्यातील हस्तापूर येथे १९ ऑक्टोबर रोजी घडली. हरिदास झिंगूजी शिवरकर (६०) यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील सोयाबीन आणि तुरीचे नुकसान झाल्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मुलाने बाभूळगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यावर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह बाभूळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
Maharashtra TimesLatur Crime : कुटुंबाचा प्रेमसंबंधांना विरोध, MPSC करणाऱ्या तरुणाने नर्स प्रेयसीसह आयुष्य संपवलं, नितीन-राणीचा करुण अंत
तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील लोही येथे १९ ऑक्टोबर रोजी घडली. नितीन चव्हाण, असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. कर्ज काढून आणि उसनवारी करून त्यांनी पेरणी केली होती. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ही परतफेड करणार होते. अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. या विवंचनेत असतानाच चव्हाण यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हे वर्ष चांगले जाईल अशी अपेक्षा असताना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. शासनाची मदत मिळत असली तरी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ती अत्यंत तोकडी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा