नक्की काय होता खटला?
मोती राणी यांनी त्यांचा पती मुरलीधर यांच्या मृत्यूनंतर रामजी नावाचे अपत्य दत्तक घेतले. पतीच्या मृत्यूनंतर रामजी यांना दत्तक घेण्यात आल्यामुळे मुरलीधर यांच्या वारसाहक्कावर रामजी यांचा काहीच अधिकार नसल्याची नोंद राम कृपाल यांनी घेतली. शेवटी, हा खटला अल्लाहबाद कोर्टात पोहचला. शेवटी, न्यायालायने सुनावणी दिली आणि रामजी यांना मुरलीधर यांचा वारसा हक्क मिळाला.
अल्लाहबाद कोर्टाने दिला निर्णय!
अल्लाहबाद कोर्टाने या खटल्याला पूर्णविराम दिला आहे. अल्लाहबाद कोर्टाच्या निर्णयानुसार, आता जर विधवेने पतीच्या मृत्यूनंतर एखादा अपत्य दत्तक घेतला तर मृत पतीच्या वारसाहक्कावरही दत्तक मुलाचा अधिकार राहणार, तसेच मुलाला मृत पतीचाही दत्तक मुलगा म्हंटले जाईल.
पूर्वीच्या कायद्यात करण्यात आला होता बदल!
आधी Hindu Adoptions and Maintenance Act, 1956 नुसार, विधवेला अपत्य दत्तक घेता येत नव्हते. जर एखाद्या महिलेला अपत्य दत्तक घ्यायचे असल्यास पतीची पूर्ण संमती असणे आवश्यक होती. पतीच्या संमतीशिवाय अपत्य दत्तक घेण्यावर बंदी होती. त्यांनतर कलम 8 नुसार, या कायद्यामध्ये पूर्ण बदल करण्यात आले. करण्यात आलेल्या बदलानुसार, विधवा महिलेला किंवा घटस्फोट घेतलेल्या महिलेला अपत्य दत्तक घेण्यासाठी पतीच्या कोणत्याही संमतीची गरज लागणार नाही.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यास किती थकबाकी मिळणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे नवीन गणित समजून घ्यादत्तक मुलाला मिळतो अधिकार
Hindu Adoptions and Maintenance Act, 1956 च्या कलम 12 नुसार, जेव्हा एखाद्या अपत्याला दत्तक घेतले जाते त्यावेळी त्या अपत्याचा आधीच्या कुटुंबाशी असणारे सगळे संबंध तुटले जातात आणि अपत्य पूर्णपणे दत्तक घेणाऱ्या कुटुंबाशी जोडला जातो. अशावेळी एखाद्या विधवेने पतीच्या मृत्यूनंतर जरी अपत्य दत्तक घेतले, तरी तो कायद्याने मृत पतीचाही दत्तक अपत्य मानला जातो.

