Headlines

Weather alert drought threat across india rain forecast for august and september; राज्यासह देशात दुष्काळाचा धोका वाढला; सप्टेंबरमध्ये कसं असेल पावसाचं चित्र? स्कायमेटने वर्तवला अंदाज


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जून-जुलैमधील पावसाची तूट ऑगस्टमध्ये भरून काढण्यात मान्सूनला अपेक्षित यश न आल्याने यंदाच्या संपूर्ण मान्सून हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’ने अद्ययावत अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाचा धोका वाढला असून, संपूर्ण हंगामात दुष्काळाची शक्यता ७० टक्के असल्याचे ‘स्कायमेट’ने नमूद केले.

भारतीय हवामान विभागाने जुलैअखेरीस जारी केलेल्या अंदाजानुसार देशभरात ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडेल असे म्हटले होते. ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, ऑगस्टमध्ये देशभरात सुमारे २१४ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असून, हा पाऊस पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या ८४ टक्के असेल. ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ७० टक्के आहे. सप्टेंबरमध्येही स्थिती फारशी बदलण्याची शक्यता नसून, सुमारे १३४ मिलीमीटर म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या ८० टक्के पावसाचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ७० टक्के आहे.

यंदाच्या मान्सूनवर वाढता ‘एल निनो’ परिणाम करू शकते, याकडे सातत्याने लक्ष वेधले जात होते. मात्र, काही भागांमध्ये विविध प्रणालींमुळे सरासरी किंवा अधिक पाऊस पडल्याने ‘एल निनो’च्या परिणामाचा व्यापक अंदाज स्थानिकांना येत नसल्याचेही दिसले. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र आणि वातावरणातील परिणामांची साखळी अधिक मजबूत होत असून, सप्टेंबरच्या सुरुवातीला ‘एल निनो’ अधिक सशक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धातील पावसावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

देशात १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ५२७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. देशभरात पावसाची एकूण तूट १३ टक्के आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात २६ टक्के, वायव्य भारतात ११ टक्के, पावसाच्या मुख्य क्षेत्रात म्हणजे मध्य भारतात एक टक्का, तर दक्षिण भारतात २२ टक्के तूट आहे. ईशान्येकडील बहुतांश राज्यामध्ये पावसाची तूट आहे. लडाखमध्ये मात्र सरासरीच्या २०३ टक्के पाऊस पडला आहे. देशात लडाख आणि ओडिशा येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे किंवा पावसाची तूट आहे. देशभरातील ७४१ जिल्ह्यांपैकी ४४ टक्के जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. तर ३७ टक्के जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत