WCL Season 3 : WCLच्या नव्या हंगामात युवी-ABD-वॉर्नर पुन्हा मैदान गाजवणार! एका नव्या संघाचीही एन्ट्री, भारत-पाक सामन्याची उत्सुकता, कधीपासून होतेय सुरुवात?
WCL Season 3 : WCLच्या नव्या हंगामात युवी-ABD-वॉर्नर पुन्हा मैदान गाजवणार! एका नव्या संघाचीही एन्ट्री, भारत-पाक सामन्याची उत्सुकता, कधीपासून होतेय सुरुवात?
WCL 2026 Schedule: वर्ल्ड लेजेंड्स चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. युवराज सिंग, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नरसह अनेक दिग्गज पुन्हा मैदानात दिसणार असून भारत-पाकिस्तान सामन्याचीही पर्वणी चाहत्यांना मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : येत्या काही महिन्यांत क्रिकेटप्रेमींसाठी मनोरंजनाचा धमाका दुप्पट होणार आहे. निवृत्त झालेल्या जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांचा समावेश असलेल्या ‘वर्ल्ड लेजेंड्स चॅम्पियनशिप’च्या (WCL Season 3) तिसऱ्या हंगामाचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जागतिक क्रिकेट गाजवणारे आंतरराष्ट्रीय दिग्गज पुन्हा एकदा बॅट आणि बॉलने मैदानावर तांडव घालताना दिसणार आहेत. एबी डिव्हिलियर्स, युवराज सिंग, ड्वेन ब्राव्हो, डेव्हिड वॉर्नर, शाहिद आफ्रिदी, मोईन अली आणि मेहमदुल्लाह यांसारखे स्टार खेळाडू या हंगामात आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कधी सुरु होणार तिसरा हंगाम?
वर्ल्ड लेजेंड्स चॅम्पियनशिपचा हा तिसरा हंगाम ३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत खेळवला जाणार आहे. गेल्या दोन हंगामांत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आयोजकांनी तिसरा हंगाम अधिक मोठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत काही नवीन नावांची भर पडली असून ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि बांगलादेशचा मेहमदुल्लाह या स्पर्धेत खेळताना दिसतील.
क्रिकेट जगतात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चाहत्यांसाठी पर्वणी ठरतो. या स्पर्धेतही चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. या लीगचा पहिला हंगाम ‘इंडिया चॅम्पियन्स’ने जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून चषक उंचावला होता. तर, दुसऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे या तिसऱ्या हंगामातही भारत-पाक सामन्यासहित अनेक जुन्या प्रतिस्पर्ध्यांमधील थरार चाहत्यांना पुन्हा अनुभवता येणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा