Vijay Anand : देव आनंद यांचे भाऊ विजय आनंद यांनी ओशोंच्या सांगण्यावरून भाचीसोबत लग्न केलं होतं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘तिसरी मंझिल’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विजय आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचं आजही कौतुक केलं जातं. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. १९७८ मध्ये विजय यांनी त्यांची भाची सुषमासोबत लग्न केलं. विजय यांच्या या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. विजय यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला विरोध केला, परंतु विजय यांनी ओशोंचा सल्ला मानून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
विजय आनंद यांचं २००४ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर, त्यांची पत्नी सुषमा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. सुषमा विजय यांच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान होत्या.
सुषमा यांनी फिल्मफेअरला सांगितलं की, १९७८ मध्ये ‘राम बलराम’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांचं लग्न झालं. सुषमा म्हणाल्या, ‘आम्ही एकमेकांना इतके आवडायचो की आम्हाला लग्न करायचं होतं. त्याला माझा साधेपणा आवडायचा. मला त्याचा स्वभाव आवडायचा. तो क्वचितच रागावायचा. मला जास्त राग यायचा. मी जास्त खेळकर होते. मी त्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम गोष्टी करायचं. कधी तो मला समजावण्याचा प्रयत्न करायचा, तर कधी मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करायचे. अनेक मुली त्याच्या मागे असायच्या. पण मला कधीही इन्सिक्योर वाटलं नाही.’
विजय आनंद १९७० च्या दशकात ओशोंचे अनुयायी बनले. त्याच सुमारास, ओशोंनी विजय यांना सुषमासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबाचा या नात्याला विरोध होता. २०२२ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैभव आनंद म्हणाले होते की, ‘त्या काळात माझ्या वडिलांच्या आयुष्यात काही अडचणी होत्या. त्यांना माझ्या आईशी लग्न करायचं होतं. रजनीश यांनी त्यांना आईबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं.’
Dev Anand : झीनत अमानच्या आकंठ प्रेमात बुडालेले देव आनंद, प्रपोज करण्यापूर्वी राज कपूर यांच्यामुळे मनाला लागली ठेच, काय घडलेलं? विजय आनंद यांचे मोठे भाऊ, देव आनंद या नात्यामुळे अजिबात खूश नव्हते. अलीकडेच, देव आनंद यांचे मॅनेजर अशोक सिन्हा यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, देव या निर्णयामुळे खूप अस्वस्थ झाले होते. अशोक सिन्हा यांनी विवेक लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्यावेळी विजय ओशोंच्या प्रभावाखाली होते. अशोक सिन्हा म्हणाले, ‘त्यावेळी विजय ओशोंच्या प्रभावाखाली होता. त्यानं पहिलं लग्न लवलीन नावाच्या महिलेशी केलं. नंतर, ओशोंच्या सल्ल्यानुसार त्यानं तिलाही सोडलं.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा