Headlines

Uddhav thackeray shiv sena supports bjp in chandrapur municipality a major setback for congress; मोठी बातमी: चंद्रपूरमध्ये ऐनवेळी सगळी समीकरणं बदलली


चंद्रपूर: महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य अजूनही कायम होतं. या महानगरपालिकेत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. मात्र बहुमतापासून काँग्रेस काहीशी दूर राहिली. त्यातच पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून वाद निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली दरबारी हा तिढा सुटला. मात्र आता चंद्रपुरात नाट्यमय घडामोडी घडल्या असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदाच्या निवडणुकीत एका मताने विजयी झाल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वातील गटाने चंद्रपूर महापालिकेत भाजपला पाठिंबा दिला असल्याने महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला.

कसा असणार सत्तेचा फॉर्म्युला?

काँग्रेससोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता भाजपचा महौपार झाल्यानंतर इतर पदांबाबत चर्चा सुरू झाली यानुसार, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना चंद्रपूरचं महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेणार आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रशांत दानव हे पाच वर्षांसाठी उपमहापौर होतील, तर स्थायी समिती ही पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहील, असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काय म्हटलं होतं?

चंद्रपूर महापालिकेतील महापौर निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रपूर येथे काँग्रेसकडे ३२चे संख्याबळ असून, दोन सदस्यांची गरज आहे. येथे शिवसेना उबाठा आणि वंचितने गट स्थापन केला असून, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू असून ‘उबाठा’सोबतही चर्चा सुरू आहे. त्याच वेळी परभणी महापालिकेत शिवसेना उबाठाला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. आता जे होईल ते दोन्ही ठिकाणी होईल, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी म्हटलं होतं.

दरम्यान, भाजपसोबत कसल्याही परिस्थितीत युती नको, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिल्याचं सांगितलं जात असतानाच चंद्रपूरमध्ये मात्र युतीची घोषणा करण्यात आल्याने उद्धव ठाकरे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत