Uday Samant On Gunratna Sadavarte: विधान परिषदेच्या मतदानानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत सामंत म्हणाले की, ही निवडणूक राज्यभरात सर्वाधिक चर्चेची ठरली.

संपर्कप्रमुख म्हणून आपण या प्रक्रियेत सक्रीय होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि अन्य नेत्यांच्या प्रयत्नांमुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे मताधिक्याने विजयी होतील. काही गैरसमज निर्माण झाले असले तरी त्यांचे निरसन करण्यात आले आहे. महायुती विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Girish Mahajan: संजय राऊत मानवी बॉम्ब! गिरीश महाजनांचा हल्लाबोल; नगरसेवकही सोडून जाण्याचा केला दावा
‘ऑपरेशन टायगर’च्या मोहिमेबाबत आम्हालाही उत्सुकता आहे. मात्र, विरोधकांकडून ज्या प्रकारच्या दाव्यांचा प्रचार केला जात आहे, त्यातून मोठी कृती घडेल असे वाटत नाही. भविष्यात विविध पक्षांतील लोक महायुतीत येऊ शकतात, असे सांगतानाच त्यांनी ठाकरे गटातील काही नगराध्यक्षांनी आधीच प्रवेश केल्याचे नमूद केले. रेल्वे कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करताना ते म्हणाले, मराठी शिकविण्याची भूमिका घ्यावी. उर्मटपणा किंवा दादागिरीला स्थान नसावे. कोणालाही मारहाण करण्यापेक्षा त्यांना मराठी शिकविणे योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
Bala Nandgaonkar : ‘नेत्यांचे पक्षांतर हा मतदारांचा अपमान’, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची ठाकरे गटाच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया
‘भास्कर जाधव पक्षांतर करणार नाहीत’
भास्कर जाधव यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. काळानुसार बदल स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र ते स्वतः पक्षांतर करतील, याबाबत आपण सहमत नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार करताना सामंत यांनी, आरोप करण्यापूर्वी संपूर्ण कागदपत्रांचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला. संबंधित जागेबाबत शासन आणि एमआयडीसीच्या पातळीवर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

