Headlines

Thief Digs Pit to Hide Stolen Bikes in Chhatrapati Sambhajinagar Police Recover Vehicles


छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका अट्टल चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या चोराला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो भळाभळा बोलू लागला. यावेळी त्याने चोरलेल्या दुचाकी नेमक्या कुठे ठेवल्या आहेत हे सांगितल्यानंतर पोलीसही आश्चर्यचकीत झाले.

Chhatrapati Sambhajinagar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, ​छत्रपती संभाजीनगर : चोरटे काय शक्कल लढवतील याचा भरोसा नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चोरट्याने तर हद्दच पार केली. या चोरट्याने दुचाकी गाड्या चोरल्या होत्या. या चोरलेल्या दुचाकी लपवण्यासाठी त्याने मोठी शक्कल लढवली. या अट्टल चोरट्याने एका तलावाच्या भिंतीच्या बाजूला खड्डा खोदून त्याखाली त्या दुचाकी लपवल्या होत्या. पोलिसांना जेव्हा संबंधित प्रकार माहिती पडला तेव्हा पोलीसही चक्रावले. विशेष म्हणजे चोरट्याचा चोरलेली दुचाकी लपवण्याची पद्धत जेव्हा शहरातील नागरिकांना समजली तेव्हा सर्वजण चकीत झाले आहेत. संबंधित चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस

हर्सूल आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी गाड्या चोरणाऱ्या एका अट्टल चोराला अटक करण्यात हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. संशयिताकडून दीड लाख रुपये किमतीच्या एकूण 4 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे वाहन चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी आरोपीला कसं शोधलं?

​मोहम्मद नवील उर्फ ‘पंडा’ अब्दुल सिराज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो 27 वर्षांचा असून छत्रपती संभाजीनगरच्या आसिफिया कॉलनीचा रहिवासी आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात समीर इसाक मोहमोद्दीन सिद्दीकी (वय ४०, रा. बेरीबाग, हर्सूल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध सुरू केला. संशयित आरोपी कोळतणवाडी भागात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

​तलावाच्या भिंतीमागे दडवल्या होत्या गाड्या

सुरुवातीला आरोपीकडून एका होंडा शाईन दुचाकीसह ताबा घेण्यात आला. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीची कोठडीत कसून चौकशी केली असता, त्याने बाबा पेट्रोलपंप आणि हर्सूल गावातून आणखी दोन मोटारसायकल चोरून त्या सावंगी तलावाच्या भिंतीमागील एका खोल खड्ड्यात लपवून ठेवल्याची कबुली दिली.

4 दुचाकी जप्त

पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून त्या गाड्या जप्त केल्या.​ या प्रकरणात एकूण 4 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ​ही धडक कारवाई सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, पोउपनि रफीक शेख, सुभाष शेवाळे, ढाकणे, फिरोज तडवी, आकाश जायभाये आणि मोहन सिंगल यांच्या पथकाने केली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा