Headlines

Thane Water Cut: ‘एल निनो’चा ठाणेकरांना फटका बसणार! 20 टक्के पाणीकपात लागू, गुरुवारी मानपाडा, दिवा, कळव्यामध्ये पाणी नाही


El Niño Impact: ठाणे जिल्ह्यात 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असून गुरुवारी 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ठाणे पाणीकपात
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनीत जांगळे, ठाणे: जून महिना सुरू झाला असला तरी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता ती तारीखही उलटली असली तरी अजून मान्सूनची प्रगती संथ गतीनेच सुरू आहे. त्यात आता ठाणेकरांसमोर पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे.

20 टक्के पाणीकपातीचा निर्णय

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. एल निनो व आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 9 जून 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थ‍िती उद्भवू नये म्हणून 20% पाणीकपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवार 18 जून रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार 19 जून रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत एकूण 24 तास बंद राहणार आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: मान्सून कोकणातच रेंगाळला, मुंबई-पुण्यात पूर्वमोसमी पाऊसही बेपत्ता; लवकरच विदर्भ, मराठवाड्यासह राज्याला दिलासा मिळणार

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपर्ण बंद राहील. तसेच, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.

ठाणे महानगरपालिकातर्फे सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Maharashtra TimesTejas Express: प्रीमियम दर भरूनही निकृष्ट सेवा, ‘तेजस एक्सप्रेस’च्या प्रतिष्ठेसह सेवादर्जात घसरण; गाडीला नेहमी 7-8 तास विलंब

पाण्याच्या उधळपट्टीवर निर्बंध?

पावसाने ओढ दिल्याने पाणीचिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पाऊस चांगला स्थिरावेपर्यंत सर्वांना सुरळीत पाणी मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या बचतीचे धोरण प्रशासनाने अवलंबले असून, त्या अंतर्गत या पाण्याच्या अन्य वापरांवर निर्बंध लादण्याची तयारी सुरू आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा