Tej Sapru : ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना यांच्यासोबतचा शुटिंगचा अनुभव सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशातच आता बॉलिवूड अभिनेते तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. शुटिंगदरम्यान राजेश खन्ना यांनी तेज यांना शिवीगाळ केलेली, असं त्यांनी सांगितलं आहे.
अभिनेत्यानं सांगितला प्रसंग
ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तेज सप्रू म्हणाले की, ‘आम्ही एका सिनेमाचं काश्मीरमध्ये आऊटडोअर शूटिंग करत होतो. त्यावेळी अचानक माझ्या मागून कोणीतरी शिवीगाळ करत असल्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर ते राजेश खन्ना होते. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण त्यावेळी ते एका अभिनेत्रीसोबत होते आणि मला शिव्या देत होते. मला त्या अभिनेत्रीचं नाव सांगायचं नाही.’
Thalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा काडीमोड रद्द! पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे तेज सप्रू पुढे म्हणाले की, ‘या प्रसंगानंतर मी खूप निराश झालेलो. शिवीगाळ केल्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. त्यावेळी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक शिबू मित्रा यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी इतर वेळी खूप शांत असतो, पण एकदा मला राग आला तर ते समोरच्यासाठी खूप वाईट ठरतं आणि शिबू मित्रा यांच्यासोबत मी १० ते १५ चित्रपटांमध्ये काम केलं होतं, त्यामुळे ते माझी समजूत काढत होते.’
‘राजेश खन्ना यांच्यासाठी माझ्या मनामध्ये खूप आदर होता आणि आहे. फक्त त्यांचा नाही तर कोणत्याही ज्येष्ठ कलाकरांचा मी कायम मान राखतो. पण, एवढा आदर देऊनही अशी शिवीगाळ केल्यानं मला खूप वाईट वाटलेलं. दुसऱ्याच दिवशी माझा आणि राजेश खन्ना यांचा एकत्र शॉट होता. पण, मी त्यांच्याशी काहीच बोललो नाही. मी दिग्दर्शकांकडून सीन समजून घेतला. शॉट झाल्यानंतर मी पुन्हा येऊन माझ्या खुर्चीवर बसलो, त्यावेळी राजेश खन्ना मागून आले आणि म्हणाले, ‘काल जे झालं ते विसरून जा’ यावर मी त्यांना म्हणालो, ‘सर माझी काहीही चूक नसताना तुम्ही मला शिवी दिलीत’ यावर राजेश खन्ना म्हणाले, ‘नाही! जे झालं ते सोड आता. संध्याकाळी पॅकअपनंतर माझ्यासोबत चल.’ त्यांनी दिग्दर्शकांनाही मला त्यांच्यासोबत पाठवायला सांगितलं. मी नाही म्हणत असताना राजेश खन्ना मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि रात्रभर आम्ही गप्पा मारल्या.’ असं तेज यांनी शेवटी सांगितलं. ‘द रेडीफ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तेज सप्रू बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा