Headlines

Suyash Tilak organises Beyond the Spotlight at Sadguru Isha Foundation Mumbai Centre; मी व्यवहारी होतो, जगभर फिरलो, पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, सुयश टिळकने दिला मनस्वास्थ्य राखण्याचा मंत्र


Suyash Tilak Isha Foundation : ईशा फाउंडेशनच्या सहकार्याने अभिनेता सुयश टिळक याने सद्गुरुंनी तयार केलेल्या ७ मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानासह ‘बियाँड द स्पॉटलाइट’ या एका भावपूर्ण संध्याकाळचे आयोजन केले

Suyash Tilak Isha Foundation Beyond the spotlight Maharashtra Times (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सेलिब्रिटींच्या नेहमीच्या भेटीगाठींपेक्षा काहीतरी वेगळा आणि सुखद अनुभव देणारा कार्यक्रम म्हणून लोकप्रिय मराठी अभिनेता सुयश टिळक याने रविवारी जुहू येथील ‘ईशा फाउंडेशन’च्या मुंबई केंद्रात ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संवाद, संगीत आणि आत्मचिंतन यांचा समावेश असलेल्या या खास कार्यक्रमात कलाकार, सर्जनशील व्यक्ती आणि मान्यवर एकत्र आले होते. या कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना केवळ आपण साकारत असलेल्या भूमिकांपलिकडे जाऊन स्वतःचे आंतरिक आरोग्य आणि प्रसन्नतेशी पुन्हा नाते जोडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

रविवार संध्याकाळची सुरुवात ‘साउंड्स ऑफ ईशा’च्या भावपूर्ण सादरीकरणाने झाली. यातील ध्यानपूर्ण संगीताने शांतता आणि आत्मचिंतनाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर उपस्थितांना सद्गुरुंच्या ‘मिरॅकल ऑफ माइंड’ ॲपद्वारे पंधरा मिनिटांच्या ध्यान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला. यावेळी त्यांनी ॲपच्या सोप्या पण प्रभावी मार्गदर्शित सरावाचा अनुभव घेतला.

सुयश टिळक काय म्हणाला?

ईशा फाउंडेशनसोबतच्या आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल बोलताना सुयश टिळक याने सांगितले की, सुरुवातीला असलेली उत्सुकता कालांतराने संस्थेशी एका दृढ नात्यात कशी बदलली. सुयश म्हणाला, “मी सद्गुरुंचे व्हिडिओ पाहायचो आणि त्यांची पुस्तके वाचायचो, पण मी काही आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस नव्हतो. मी खूप व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणारा आणि जगभर एकट्याने प्रवास करणारा (सोलो ट्रॅव्हलर) व्यक्ती आहे. मात्र अभिनयाच्या प्रवासात मी माझ्या मानसिक आरोग्याकडे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करु लागलो होतो. ‘इनर इंजिनिअरिंग’ हा कार्यक्रम केल्यानंतर मला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, ज्यांचे ओझे मी बऱ्याच काळापासून वाहत होतो. तेव्हाच मला जाणीव झाली की या पद्धती प्रत्येकालाच मदत करु शकतात; म्हणूनच ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ ही संकल्पना पुढे आली.”
Maharashtra TimesChaitanya Chandratre : रस्ते चांगले करणाऱ्यांना गांधीजी हवेत, खड्डे पुन्हा मुंबईकरांच्या कवेत! मुंबईतील खड्ड्यांवरुन मराठी अभिनेत्याचे तिरकस टोले
त्यानंतर झालेल्या संवादात उपस्थितांना त्यांच्या विविध भूमिकांच्या पलिकडे जाऊन स्वतःशी पुन्हा नाते जोडण्यास प्रोत्साहित करण्यात आले. सुयशने धावपळीच्या वेळापत्रकात आणि सार्वजनिक जीवनातील तणावाच्या काळातही काही क्षण थांबून शांतता अनुभवण्याचे महत्त्व, तसेच दैनंदिन जीवनात आंतरिक समतोल जपण्याचे मूल्य यांवर भाष्य केले.

अनेक कलाकारांची उपस्थिती

या कार्यक्रमाला मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली; यामध्ये किशोरी गोडबोले, स्नेहलता वसईकर, श्याम आणि रेशमी पाठक, अपर्णा दीक्षित, दुर्वा साळुंखे, पूजा पाटील, समित आणि रेशा राऊत, पांडुरंग पखाले, चारुल देशपांडे, दीप्ती दांडेकर, मंजिरी पुपाला, बेलिना डो, अश्विन शिवशरण आणि निरंजन जावीर यांचा समावेश होता. या सर्वांनी मनन-चिंतनाच्या या संध्याकाळमध्ये सहभाग घेतला आणि मानसिक स्वास्थ्य व सजग जीवनशैलीला प्राधान्य देणारी अशी ठिकाणे निर्माण केल्याबद्दल प्रशंसा केली.

Suyash Tilak Isha Foundation Beyond the spotlight  Maharashtra Times

अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाविषयी सांगितले, “मी गेली दोन वर्षे सद्गुरुंच्या मार्गदर्शनानुसार शांभवी महामुद्रा साधनेचा सराव नियामितपणे करते आणि त्यामुळे मला सदोदित आनंदी राहण्याचा महामंत्र सापडला आहे.”

हा एक वेगळा अनुभव असल्याचे सांगत आणि ध्यानामुळे आपल्याला शांतता मिळते हे मान्य करत, मराठी आणि हिंदी मालिकांमधील अभिनेत्री स्नेहलता वसईकर म्हणाल्या, “मी कोईम्बतूरला जाण्यास उत्सुक आहे आणि सद्गुरुंसोबतचा हा आध्यात्मिक प्रवास सुरु करण्यासाठी मी लवकरच तिथे जाणार आहे.”

Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा

स्वतः ‘ईशा क्रिया’चा गेल्या काही वर्षांपासून सराव करणारे आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेले श्याम पाठक म्हणाले, “हा एक अद्भुत अनुभव होता, जो मला वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळीवरही उपयुक्त ठरेल.”

पाहुण्यांमधील संवादांनी संध्याकाळची सांगता होत असताना, ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’मुळे संगीत, सजगता आणि अर्थपूर्ण संवाद यांचा सुरेख संगम घडवून आणणारे एक व्यासपीठ यशस्वीपणे निर्माण झाले.
Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढे स्वतः याच्या गाडीवर चायनिज खातात; मराठी नाटकाला ताज्या घडामोडींचा संदर्भ, निखिल चव्हाणचा डायलॉग चर्चेत

‘मिरॅकल ऑफ माइंड’

‘मिरेकल ऑफ माइंड’ हे सद्गुरूंचे एक मोफत ध्यान (मेडिटेशन) ॲप आहे, जे मानसिक आरोग्यासाठी ७ मिनिटांचे एक साधे ‘गाइडेड मेडिटेशन’ उपलब्ध करुन देते. युजर त्यांच्या पसंतीनुसार या ध्यानाचा कालावधी २१ मिनिटांपर्यंत वाढवू शकतात. आधुनिक जीवनशैलीत सहजपणे सामावून घेता येईल अशा प्रकारे तयार केलेले हे ॲप, लोकांना दैनंदिन ध्यानधारणेद्वारे अधिक स्पष्टता, समतोल आणि आंतरिक स्वास्थ्य अनुभवण्यास मदत करते.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा