Headlines

Sharad Pawar And Eknath Shinde React At Vidhan Bhawan For Meeting on Maharashtra Karnataka Border Issue


ज्येष्ठ नेते शरद पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. तसेच आजारपणावर मात करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनात पोहोचले आहेत. विधान भवनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

Sharad Pawar Latest News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्य विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान आज विधान भवनात मोठ्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज विधान भवनात दाखल झाले आहेत. विधान भवनात आज एक अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाबाबत ही बैठक असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेतेदेखील हजर असल्याची माहिती आहे.

आजारपणावर मात करुन शिंदे विधान भवनात

शरद पवार विधान भवनात दाखल झाल्याचं वृत्त असताना आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनात दाखल झाले. ते सुद्धा महाराष्ट्र-कर्नाटक समीवादाशी संबंधित बैठकीत सहभागी होण्यासाठी आल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आजारपणावर मात करुन ते आज विधान भवनात दाखल झाले.

एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांचे हस्तांदोलन

एकनाथ शिंदे आज विधान भवनात दाखल झाल्यानंतर एक अनोखी घटना घडली. एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर त्यांना अचानक भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांनी स्मितहास्य देत हस्तांदोलन केलं. विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेते समोरासमोर आले. यावेळी मिलिंद नार्वेकर आणि शिंदे यांनी हस्तांदोलन केलं. यावेळी नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची तब्येतीची विचारपूस केली. यानंतर दोन्ही नेते आपापल्या मार्गाला लागले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत विधान भवनात बैठक

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून आहे. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दिल्ली दौऱ्यातून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्यास गुजरात तयार असल्यााची गुडन्यूज देवेंद्र फडणवीस घेऊन आले आहेत. तसेच महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पात केवळ 27 कोटी देणे असल्याचं बैठकीत ठरल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या वादावरचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मुख्यमंत्री महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

शरद पवारांचा पक्ष एनडीएत दाखल होणार असल्याची चर्चा

दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांनंतर शरद पवार आज विधान भवनात बैठकीसाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. शरद पवार या बैठकीनंतर याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया देतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा