Headlines

Sukunya Kulkarni Mone: काही कलाकार मेकअप रूममध्ये भिंती, आरसे किंवा पडदे अस्वच्छ करून ठेवतात; नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर स्पष्टच बोलल्या सुकन्या मोने


मुंबई टाइम्स टीम
प्रेक्षक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहताना तुम्हाला काय जाणवलं ?

गेल्या वर्षी मी ‘मटा सन्मान’च्या नाटक विभागाचं परीक्षण केलं होतं. त्यामुळे महिनाभरात अनेक नाटकं पाहताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे मराठी रंगभूमीवरील विषयांचं वैविध्य. प्रेक्षकही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. काही वर्षांपूर्वी नाट्यगृहांमध्ये कमी प्रेक्षक दिसत होते, ती परिस्थिती आता बदलताना दिसतेय. याचा अर्थ प्रेक्षकांना नाटक हवं आहे. नाटक हा जसा कलाकारांसाठी जिवंत अनुभव असतो, तसाच तो प्रेक्षकांसाठीही असतो. आज नेपथ्य, प्रकाशयोजना आणि तांत्रिक मांडणीमध्येही मोठे प्रयोग होत आहेत.आजची तरुण पिढी रंगभूमीकडे अधिक आकर्षित होताना दिसते. त्यांना त्यांच्या भावना, विचार आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम वाटतं. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून अनेक तरुण मंडळी पुढे येत आहेत.

आता थांबवायचं कसं?’च्या तरुण कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?
आकाश आणि ऐश्वर्या या दोघांसोबत काम करणं हा माझ्यासाठीही एक वेगळा अनुभव होता. हे त्यांचं पहिलंव्यावसायिक नाटक आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांना रंगभूमीच्या काही वेगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागल्या. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की, अभिनय करण्यापेक्षा त्या भावनेत स्वतःला झोकून द्या. तुम्हाला स्वतःला जेव्हा त्या प्रसंगाची वेदना किंवा आनंद जाणवेल, तेव्हाच तो अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. मात्र या दोघांकडून मलाही खूप काही शिकायला मिळालं. त्यांची चिकाटी, मेहनत आणि शिकण्याची तयारी विलक्षण होती. प्रयोगागणिक त्यांच्यात होत गेलेली प्रगती पाहणं हा आनंददायी अनुभव होता.

Maharashtra TimesAaraya Ghare : मी माझा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केलेला, आर्या घारेने सांगितली बर्थेडेची आठवण

नाट्यगृहांच्या सुविधा आणि देखभालीबाबत तुमचं मत काय आहे ?
आज अनेक नाट्यगृहांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवतो. काही ठिकाणी नाट्यगृहांची स्वच्छता, देखभाल आणि कलाकारांसाठी आवश्यक असलेल्या सोयी व्यवस्थित नसतात. मात्र याबाबतीत केवळ प्रशासन किंवा व्यवस्थापनालाच दोष देऊन चालणार नाही. कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक आणि नाट्यगृह प्रशासन या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ती जागा आपल्याच घरासारखी जपली पाहिजे. काही कलाकार मेकअप रूममध्ये भिंती, आरसे किंवा पडदे अस्वच्छ करून ठेवतात. हे चित्र बदलायला हवं. पूर्वी नाट्यपरिषदेतर्फे नाट्यगृहांची नियमित पाहणी करणारी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. लॉकडाऊनमुळे तो पुढे जाऊ शकला नाही. पण अशी व्यवस्था व्हायला हवी. कौतुकाची बाब म्हणजे रवींद्र नाट्यगृह अत्यंत सुंदर आणि सुयोग्य सुविधांनी युक्त आहे. त्यासाठी संचालिका मीनल जोगळेकर यांचं विशेष कौतुक आहे.

गिरीश ओक – सुकन्या मोने पुन्हा एकत्र, आता थांबवायचं कसं? डोळ्यांत अंजन घालणारं नाटक

नाटकांचे वाढते खर्च, तिकीटदर आणि प्रेक्षकांची भूमिका याकडे तुम्ही कसं पाहता ?
मराठी प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी येत नाही, तर विषय समजून घेण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी येतो. त्यामुळे आज नाटक आणि प्रेक्षक यांच्यातील नातं अधिक मजबूत झालंय. मराठी रंगभूमी सध्या सकारात्मक आणि समृद्ध टप्प्यातून जातेय. आज निर्मात्यांसमोरही अनेक आर्थिक आव्हानं आहेत. नाटक उभं करणं, कलाकार आणि तंत्रज्ञांचा प्रवास, नेपथ्य, जाहिरात, नाट्यगृह भाडं अशा खर्चामध्ये वाढ झाली आहे. निर्माते केवळ नफा कमावण्याच्या उद्देशानं काम करत नसून; त्यांना चांगलं नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अशा परिस्थितीत तिकीटदरांबाबतही वास्तववादी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. महागाई सर्वसामान्यांना जाणवते, तशीच ती नाट्यनिर्मितीलाही जाणवते. अर्थात, प्रेक्षकांचं म्हणणंही योग्य आहे. तिकीटदर वाढत असतील, तर नाट्यगृहांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुविधा याही तितक्याच चांगल्या असायला हव्यात. निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ सगळेच चांगली नाटकं देण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. त्यामुळे प्रेक्षक, नाट्यगृह प्रशासन आणि सांस्कृतिक संस्था यांनीही त्याला तितकीच साथ दिली पाहिजे.

Maharashtra TimesIsha keskar: ‘जय मल्हार’ मालिकेसाठी ईशा केसरकरला मिळायचं पर डे इतकंच मानधन, स्वत:च केला खुलासा
आज अनेक नाट्यगृहांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवतो. मात्र याबाबतीत केवळ प्रशासन किंवा व्यवस्थापनालाच दोष देऊन चालणार नाही. कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक आणि नाट्यगृह प्रशासन या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे.”
– सुकन्या मोने

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत