Why Sugar Rate Hike Explained: भारतातील खुल्या बाजारातील साखरेच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकीवर पोहोचल्या आहेत आणि सणासुदीच्या काळात या दरवाढीच्या आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एकच प्रश्न सध्या चर्चेत आहे तो म्हणजे की अचानक साखरेच्या किंमती वाढण्याचे कारण काय?

एका महिन्यात साखरेचा गोडवा 13% महागला
सणासुदीचे दिवस सुरू होण्याआधी देशभरातील अनेक राज्यांमध्ये साखरेचे भाव चढेच राहिले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या किंमतीत सतत वाढ होताना या काळात देशात साखरेच्या सरासरी किरकोळ दरात गेल्या महिन्यात 13.04 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून समोर येते.
साखरेच्या स्टॉकवर सरकारची नवीन मर्यादा
सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखरेच्या साठवणुकीवरील मर्यादा आणखी कडक केल्या आहेत. सरकारच्या नवीन आदेशांनुसार जे व्यापारी दरमहिन्याला 10 मेट्रिक टनपेक्षा जास्त साखरेचा व्यापार किंवा वापर करतात, त्यांना आता जास्तीत जास्त 15 दिवस पुरेल इतकीच साखर बाळगण्याची परवानगी असेल. 1 सप्टेंबरपासून हा नवीन नियम लागू होईल आणि 30 नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहील.
10 वर्षांत पहिल्यांदाच साखर आयातीची नामुष्की
शेतात पुरेसा ऊस आहे, पण सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल कार्यक्रमासाठी शेकडो डिस्टिलरीज उभारल्या गेल्या आणि देशांतर्गत पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी सरकारने निर्यातीवर आधीच निर्बंध घातले. तरीही साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत, ज्यामुळे मोदी सरकारला गेल्या अनेक दशकांपासून शक्यतो टाळला जाणारा पर्याय – साखर आयात – पर्यायाचा विचार करावा लागत आहे.
साखरेच्या विक्रमी दरवाढीची कारणे काय
सणासुदीच्या तोंडावर स्वयंपाकातील प्रमुख घटक असलेल्या साखरेच्या दरात अचानक झालेल्या या प्रचंड दर वाढीमुळे अनेकांच्या चहाचा गोडवाच नाहीसा झाला. तर, सध्या साखरेचे भाव 65 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. साखर निर्यातीचा भत्ता आणि ऊसावर आधारित फीडस्टॉक इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्याबरोबरच कमी उत्पादन ही कारणे अलीकडच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरणारे प्रमुख घटकांपैकी आहेत.
साखरेच्या महागाईमागे इथेनॉलचे कारण
बऱ्याच अंशी हे कारण बरोबर मानलं जात आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचे सरकारचे E20 लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उसाचा रस आणि मळीचा मोठा भाग इथेनॉल उत्पादनाकडे वळवला गेला. यामुळे, साखर कारखान्यांमध्ये उसाची कमतरता निर्माण झाली, उत्पादन घटले आणि बाजारातील पुरवठा-मागणीच्या संतुलनात व्यत्यय येऊन किमती वाढल्या आहेत.
सणासुदीत साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता
भारत साखरेचा जगातील सर्वात सर्वात ग्राहक देश आहे. आपल्याकडे ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणासुदीच्या दिवसांत साखरेची मागणी वाढते. घरा-घरांत गोडाधोडाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते त्यामुळे, मिठाई, बिस्किटे आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करतात. त्यामुळे, पुढील काही दिवसांत साखरेचा गोडवा आणखी महाग होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.
साखरेची जमाखोरी
साखरेच्या जमखोरीमुळे खुल्या बाजारातील साखरेचे दर 65 रुपये किलोच्या वार्षिक उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सणासुदीच्या काळातील (गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी) अगदी आधी पुरवठा नियंत्रित करण्यासाठी नवीन नियम लागू केले जात आहेत. मोठ-मोठ्या व्यापाऱ्यांनी साखरेचा पुरवठा रोखून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली, ज्याचा थेट परिणाम किंमतीवर झाला.
कमी पाऊस अन् कोरड्या हवामानाने वाढवली चिंता
त्याचवेळी, साखरेदीच्या पुरवठ्याबाबत चिंता केवळ वाढत्या मागणीमुळेच नाही. देशातील काही भागांतील उसाच्या पिकावर अनियमित पाऊस आणि कोरड्या हवामानाचा परिणाम झाला, परिणामी उसाचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न झाल्यास पुढील काही दिवसांत साखरेचे उत्पादन आणि उपलब्धता प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत, सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी किमतींवर आणखी दबाव वाढू शकतो.
महागाईचा राक्षस सरकारच्या मानगुटीवर
साखर भारतीयांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात संवेदनशील पदार्थ असून त्याच्या दरवाढीचा सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटवर थेट परिणाम होतो. सणासुदीच्या दिवसांत साखरेची मागणी वाढते, त्यामुळे सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी सातत उपाययोजना करत आहे. यादरम्यान, सरकारने साखरेचा साठा मर्यादा 30 दिवसांवरून 15 दिवसांपर्यंत कमी केली असून आता सरकार साखरेची उपलब्धता, दर आणि नवीन हंगामातील पिकावर बारकाईने लक्ष ठेवून असेल.

