Headlines

Sugar Import Duty; सणासुदीच्या तोंडावर साखरेत तेजीचा गोडवा! निर्यात बंदी, स्टॉक लिमिटनंतर आता 100 टक्के शुल्क माफीचा विचार


Sugar Imports: श्रावण महिन्याच्या सुरुवातीसह देशभरात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत, पण त्याआधीच महागाईचा राक्षस मानगुटीवर येऊन बसला आहे. कालपर्यंत लोक सहज एक-दोन किलो घरी आणू शकत असलेल्या साखरेच्या किमतीने अचानक स्वयंपाकघराचे बजेट विस्कळीत केले आहे. गेल्या 15 दिवसांत साखरेची किंमत सुमारे 17 रुपये किलोनी महागली आहे.

अशाप्रकारे, साखरेच्या दरवाढीमुळे बाजारात घबराट पसरली असून सर्वसामान्य आणि दुकानदार या दोघांची चिंता वाढली आहे. सणासुदीच्या तोंडावर या दरवाढीमुळे काळाबाजार वाढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी सरकारला सारखेची किंमत तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, अन्यथा दिवाळीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असे आवाहन केले आहे.

Maharashtra Times8th Pay Commission Pension Hike: तीन ते चार पट पेन्शन वाढीचा प्रस्ताव: ज्यांना 50 हजार अपेक्षित, त्यांना 1.91 लाख मिळू शकतो; पगारनिहाय पाहा पेन्शनचं गणित

साखरेच्या वाढत्या किमतीवर सरकार स्ट्राईक करणार

अशा परिस्थितीत, बाजारातील सद्यस्थितीची दखल घेऊन सरकार साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी आयातीवरील 100 टक्के शुल्क कमी केले जाऊ शकते किंवा पूर्णपणे रद्द करण्यासारखे मोठे पाऊल उचलू शकते, असा दावा ब्लूमबर्ग अहवालातून समोर आला आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा वाढवून भाव खाली आणण्याचा या पावलाचा उद्देश आहे.

दरम्यान आता सध्या हा प्रस्ताव फक्त विचाराधीन असून आयात शुल्क कमी करणे किंवा पूर्णपणे हटवण्याचा सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शुल्क किती कमी केले जाईल? कोणत्या प्रकारच्या साखरेला सवलत मिळेल आणि आयातीवर काही मर्यादा घातल्या जातील का? याबाबत अजूनही साशंकता आहे.

Maharashtra TimesHousing Society Rules: हाउसिंग सोसायटीत भाडेकरूने नियम मोडला, तर दंड घरमालकाने भरायचा की भाडेकरूने? सोसायटीच्या दंडाचे नियम पाहा

साखरेवर 100 टक्के शुल्क

सरकारने फेब्रुवारी 2018 पासून साखरेवरील आयात शुल्क 50% वरून 100% पर्यंत वाढवलेले जेणेकरून देशांतर्गत बाजारातील किंमतींना लगाम आणि शेतकऱ्यांना स्वस्त परदेशी साखरेपासून वाचवले जाऊ शकेल. अशा स्थितीत, साखरेवरील 100 टक्के शुल्क अजूनही लागू आहे.

वरील स्थिती सोप्या भाषेत समजायची तर, परदेशातून 100 रुपयांची साखर आयात केल्यास वाहतूक आणि इतर खर्चांसह 100 रुपये आयात शुल्क आकारले जाते. यामुळे परदेशातून साखर आयात करणे महाग होते. अशा स्थितीत, शुल्क कमी केले किंवा काढून टाकले तर परदेशी साखर भारतात स्वस्त होऊ शकते. आयात वाढल्याने देशांतर्गत बाजारात पुरवठा सुधारेल आणि किमतींवरील दबाव कमी होईल.

मात्र यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या किमती लगेचच निम्म्या होतील, असं नाही. सरकार किती साखर आयात करण्यास परवानगी देते, जागतिक दर काय आहेत आणि आयात केलेला माल बाजारात केव्हा पोहोचतो या घटकांवरही किमती अवलंबून असतील.

Maharashtra TimesGratuity Calculator: 5 वर्ष काम केल्यानंतर 20000 च्या बेसिक सॅलरीवर किती ग्रॅच्युइटी मिळेल? एक छोटा फॉर्म्युला सांगेल सगळा हिशोब

भारतीय बाजारांमध्ये सध्या साखरेचा दर किती?

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत देशात साखरेची किरकोळ किंमत 49 रुपये किलोच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. तसेच कारखान्यात उत्पादित साखरेचे भावही सुमारे तीन महिन्यांत 39 रुपयांवरून 45 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले असून ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारातील घाऊक भाव 4400 ते 4800 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 44 ते 48 रुपये प्रति किलो या दरम्यान होते.

याच दरवाढीमुळे 13 ऑगस्ट रोजी बलरामपूर चिनी, धामपूर शुगर, दालमिया भारत शुगर, श्री रेणुका आणि उत्तम शुगर यांसारख्या शेअर्सनी ट्रेडिंग दरम्यान 7% पर्यंत उसळी घेतलेली. याशिवाय, वाढलेल्या किमतींमुळे साखर कंपन्यांच्या कमाईला चालना मिळेल असे बाजाराला अपेक्षित होते.

दुसरीकडे, देशांतर्गत पुरवठा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने याआधी 13 मे रोजी कच्ची, पांढरी आणि शुद्ध यांसारख्या साखरेच्या निर्यातीवर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी घातलेली आहे. या दरम्यान, सरकारने अंदाजे 1.59 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती, पण बंदी लागू असेपर्यंत व्यापाऱ्यांनी अंदाजे 8 लाख टन साखरेचा व्यवहार केला आणि 6 लाख टनांहून अधिक साखर परदेशात पाठवली. काही विशिष्ट श्रेणी आणि बंदरांवर आधीच उपलब्ध असलेल्या वस्तूंना यातून सूट दिल्याचेही रॉयटर्सने अहवालात म्हटले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत