Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 : विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पर्यटनाला अधिक चालना देणारा १५ कोटी रुपयांचा ‘एकात्मिक पर्यटन सर्किट’ प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बैतूल जिल्ह्यातील कुकरू येथे याबाबत अधिकृत घोषणा केली. या सर्किटअंतर्गत महाराष्ट्रातील चिखलदरा, मेळघाट, मुक्तागिरी आणि मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील कुकरू ही चार प्रमुख पर्यटनस्थळे एकमेकांशी जोडली जाणार असून, यामुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

तीन लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत
जिल्ह्यातील १२ प्रमुख बँकांमधील एकूण तीन लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत आले असून, यामध्ये २ लाख २ हजार थकीत कर्जदार आणि ९३ हजार नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. या सर्वांची मिळून तब्बल २ हजार ८६२ कोटी रुपयांची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने तयार केली असली, तरी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित असल्याने महाआयटीच्या संथ पोर्टलमुळे ऐन पेरणीच्या दिवसांत ही मदत शेतकऱ्यांच्या हातात पडणार का, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Sachin Ahir : अरुण गवळींचा भाचा, मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी उत्सवासाठी ओळखलं जाणारं नाव; ठाकरेंना धक्का देणारे सचिन अहिर कोण आहेत?
२ लाख २ हजार १६७ पात्र थकबाकीदार शेतकरी
प्रशासनाने जाहीर केलेल्या २ लाख २ हजार १६७ पात्र थकबाकीदार शेतकरी खात्यांसाठी सुमारे २३३८ कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. यात नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक ७१,६५५ लाभार्थी असून ७०० कोटींची रक्कम अडकली आहे. त्याखालोखाल स्टेट बँकेचे ४१.१३५ शेतकरी (५१३ कोटी) आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे २९.९८० शेतकरी (४८८ कोटी) लाभार्थी आहेत. इतर प्रमुख बँकांमध्ये सेंट्रल बँक ( २९.०१० शेतकरी- २९८ कोटी), बँक ऑफ इंडिया (७.७८३ शेतकर – ८० कोटी), इंडियन बँक (७.२४७ शेतकरी- ८२ कोटी), युनियन बँक (६.१७०शेतकरी- ७६ कोटी), बँक ऑफ बडोदा ( ३.१०२ शेतकरी – ४७ कोटी), महाराष्ट्र ग्रामीण बँक ( २, ०८३ शेतकरी – २९ कोटी), पंजाब नॅशनल बँक ( २,१८२ शेतकरी – ८ कोटी), कॅनरा बँक ( १,९०२ शेतकरी – ९ कोटी) आणि युको बँकेच्या ५७८ शेतकऱ्यांच्या ५ कोटी रुपयांचा समावेश आहे.
नियमित कर्जदारांना ५२४ कोटींचे प्रोत्साहन
वित्तीय शिस्त पाळणाऱ्या आणि वेळेत ५० हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर लाभ घेणाऱ्या ९३,१३९शेतकरी खात्यांसाठी ५२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातही जिल्हा बँकेचे सर्वाधिक ४८,८६९ शेतकरी (२४४ कोटी) पात्र ठरले आहेत. तर स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, इंडियन बँक, ग्रामीण बँक, युको बँक आणि कॅनरा बँक मिळून एकूण ४३,७७९ शेतकर्यांऱ्या खात्यात २८० कोटी रुपये जमा केले जाणार आहे.
Sachin Ahir : ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील कारण समोर
‘ओटीएस’बाबत संभ्रम
वन टाइम सेटलमेंट अर्थात ओटीएस योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकरी आधी स्वत:चा हिस्सा कसा भरणार आणि यावर शासनाने बँकांशी समन्वय साधून काही तोडगा काढला आहे का, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. ग्रामीण भागातील सर्व्हर डाऊन आणि भारनियमनाचा गोंधळ यंत्रणा कशी टाळणार, असा प्रश्रही विचारला जातोय.

