Somy Ali On Salman Khan : सोमी अलीनं सलमान खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे चर्चेत आला आहे. सोमीचा दावा आहे की, तिनं स्वतः सलमान खानला मेसेज करून बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता, पण अभिनेत्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं.
सलमान खानबद्दल काय म्हणाली सोमी अली?
सोमी अलीनं सांगितलं की, तिनं सलमान खानच्या प्रायव्हेट नंबरवर मेसेज पाठवला होता. सोमी म्हणाली, ‘मी सलमान खानला त्याच्या खाजगी नंबरवर मेसेज केला. मी त्याला सांगितलं की अजून वेळ गेलेली नाहीये, तू बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागायला हवी. तू केलेल्या चुकीबद्दल माफी माग. सर्व काही ठीक होईल. पण तो ऐकला नाही.’ Maharashtrachi Hasyajatra फेम निमिष कुलकर्णीची भरारी! अभिनेत्याची मराठी सिनेमात वर्णी; चाहते उत्सुक सोमी म्हणाली की, तिनं केवळ सलमान खानलाच नाही, तर बिश्नोई समाजालाही आवाहन केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी बिश्नोई समाजाला सांगितलं की, सलमानला मारल्यानं तुमचं काळवीट परत येणार नाही. मी सलमानच्या वतीनं हात जोडून विनंती करते की त्यांनी माफ करावं. मी माझ्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.’
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमधील जोधपूर येथे दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. बिश्नोई समुदाय काळवीटांना पवित्र मानतो आणि या मुद्द्यावरून आंदोलनं सुरू आहेत. २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयानं सलमान खानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण, नंतर त्याला जामीन मंजूर झाला आणि हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. या प्रकरणासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून सलमानला अनेक धमक्या मिळाल्या आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा