Headlines

revenue minister chandrashekhar bawankule announces that tribal lands can be given on lease; आदिवासींच्या जमिनी आता भाडेतत्त्वावर देता येणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा


Chandrashekhar Bawankule: हेक्टरी सव्वालाख रुपये दर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. याहून कमी दराचा करार करता येणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

bawankule news
bawankule news(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : आदिवासींच्या जमिनी थेट भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

महसूल विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने शुक्रवारी बावनकुळे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गैरआदिवासींना देण्याची कुठलीही तरतूद कायद्यात नव्हती. आता या जमिनी गैरआदिवासींना भाडेतत्त्वावर देता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष हा भाडेपट्टा भरावा लागणार आहे.
Maharashtra TimesGadchiroli News: माओवाद्यांकडून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा; कारवाई थांबविण्याचे केंद्र सरकारला आवाहन
खनिजाचा प्रतिटन मोबदला द्यावा लागणार
आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीत असलेल्या गौण खनिजाची खासगी कंपन्यांना उत्खनन आणि विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. करार झाल्यानंतर उत्खनन केलेल्या गौण खनिजाच्या तुलनेत प्रतिटन किंवा प्रतिब्रास हा मोबदला आदिवासी शेतकऱ्याला द्यावा लागेल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.
Maharashtra TimesMaharashtra Weather Update: नवरात्रीत मेघगर्जना! २५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, IMDकडून अलर्ट जारी
टीकेवरुन पडळकरांशी बोलणार
राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करून टीका करणे चुकीचे आहे. ही भाजपची संस्कृती नाही. राजकारणात विरोधकांवर टीका केली जाते. मात्र व्यक्तिगत भाष्य करताना काळजी घ्यायला हवी. भविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या निमित्ताने ‘ताई-दादा’ एकत्र येण्याच्या अनुषंगाने झळकलेले फलक या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यातून राजकीय अर्थ काढू नये. उद्धव आणि राज ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी गडचिरोलीपासून मुंबईपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुतीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांना आणीबाणी मान्य आहे. देशात अराजकता निर्माण करणाऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणीबाणीचे संस्कार असलेल्यांकडून फार काही अपेक्षा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा