Headlines

Reva Kaurase : 3 दिवस ऑडिशन, निर्मात्याची घाणेरडी मागणी, खचलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री; सांगितला प्रसंग


Reva Kaurase : ‘बिग बॉस मराठी ६’ फेम रेवा कौरासेनं कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. या प्रकारामुळे ती खूप खचली होती, असं रेवानं सांगितलं.

Reva Kaurase Casting Couch Experience
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘बिग बॉस मराठी ६’ मधून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री रेवा कौरासेनं तिच्या करिअरमधील एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. रेवाने खुलासा केला की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आली होती, पण जेव्हा तिला तडजोड करण्यास सांगितलं गेलं, तेव्हा तिनं क्षणाचाही विचार न करता तो प्रोजेक्ट सोडून दिला.

रेवानं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

रेवानं सांगितलं की, तिला हैदराबादला बोलावण्यात आलं होतं. तिथं तिनं तीन दिवस लुक टेस्ट, कॅमेरा टेस्ट आणि वर्कशॉप केले. रेवा म्हणाली, ‘सर्व काही पूर्णपणे प्रोफेशनल वाटत होतं. मला खात्री होती की, मला चित्रपट मिळाला आहे. मला साइनिंग अमाऊंटसुद्धा देण्यात आली होती आणि शुभ दिवशी करारावर सही केली जाईल असंही सांगण्यात आलं होतं.’

Maharashtra TimesKamlesh Sawant : ‘माझे ७० लाख बुडाले आहेत’, मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचा दावा, सांगितला किस्सा
रेवानं सांगितलं की, काही काळानंतर निर्मात्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. जेव्हा तिनं त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा तिला अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलं की, चित्रपटाच्या एका निर्मात्याला तिच्याकडून वैयक्तिक गोष्टींची अपेक्षा आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला धक्का बसला. त्यावेळी माझी करिअर नुकतंच सुरू झालेलं. कोणी असं काही बोलू शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता.’

Maharashtra TimesGeeta Kapoor : पोटच्या लेकाकडून छळ, जेवणाचेही केले हाल, घर विकून पसार; मुलाच्या आठवणीत सुप्रसिद्ध अभिनेत्री झालेली बेहाल, अखेर दुर्दैवी अंत
अभिनेत्री म्हणाली, ‘जर हीच अट होती, तर तुम्ही मला सुरुवातीलाच सांगायला हवं होतं. माझा वेळ का वाया घालवत आहात? मी त्याच क्षणी ठरवलं की, मला हा चित्रपट करायचा नाही. मी त्या व्यक्तीशी पुन्हा कधीच बोलले नाही.’

स्वखर्चाने अभिनेत्री पुण्याला आली

चित्रपट सोडल्यानंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की, निर्मात्यांनी रेवासाठी परतीचं तिकीटही बुक केलं नाही. रेवा म्हणाली, ‘मी माझ्या स्वतःच्या पैशाने तिकीट काढलं आणि पुण्याला परत आले. मी इतकी खचले होते की, काय घडलं हे मी माझ्या कुटुंबालाही सांगू शकले नाही.’ या घटनेचा रेवावर खूप खोलवर परिणाम झाला. रेवा म्हणाली, ‘जवळपास दोन महिने मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकले नाही. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना आधीच सांगितलं होतं की, मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. पण अचानक रिकाम्या हातानं परत येणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.’

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

रेवा म्हणाली की, तिनं तिच्या बहिणीला सर्व काही सांगितलं, त्यानंतर ती हळूहळू या घटनेतून सावरली. या घटनेनं तिला खूप काही शिकवला. आता, कोणताही प्रोजेक्ट निवडण्यापूर्वी ती अत्यंत सावधगिरी बाळगते. रेवा म्हणाली, ‘या घटनेनंतर मी अनेक चांगल्या दिग्दर्शकांसोबत आणि प्रोडक्शन हाऊससोबत काम केलं आहे. त्यामुळे, मी एका घटनेच्या आधारावर संपूर्ण इंडस्ट्रीवर टीका करू शकत नाही.’ ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेवानं घडलेला प्रकार सांगितला आहे.

दरम्यान, रेवा कौरासेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं काही मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात अभिनेत्री सहभागी झाली होती.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा