Headlines

Ram Kapoor Statement On Cheating In Marriage Lock Upp 2 ;


Ram Kapoor Troll : अभिनेता राम कपूर सध्या लॉक अप 2 मधील त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. लग्नातली फसवणूक सामान्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

ram kapoor
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेता राम कपूर ‘लॉक अप: सच या सजा’या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका विधानामुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी सामूहिक अत्याचाराबाबत केलेल्या विधानांमुळे आणि पाण्याअभावी एक ‘टास्क’ मध्ये व्यत्यय आणल्यामुळे टीका झाली होती, आता लग्नात धोका देण्याबाबत त्याने आपले मत व्यक्त केले त्यामुळेही त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. शोमधील एका संभाषणादरम्यान रामने म्हटले की, जर एखादे जोडपे एकमेकांवर मनापासून प्रेम करत असेल, तर जोडीदाराने फसवणूक केली तरीही नाते संपवण्याचे ते एकमेव कारण ठरू शकत नाही. या विधानामुळे लोकांची मते दोन गटांत विभागली गेली.

श्रेया कालरा हिने राम कपूरला विचारले की, जर त्याला समजले की त्याच्या जोडीदाराने त्याची फसवणूक केली आहे, तर तो दुसरे नाते शोधेल का? यावर उत्तर देताना राम म्हणाला, “नाही, तुम्ही नाते सुधारता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करत असाल, तर कोणतीही गोष्ट नाते संपवू शकत नाही. लग्न ही एक कठीण गोष्ट आहे; तो एक प्रवास आहे. तुम्हाला दररोज तुमचे नाते जपावे लागते.”

Maharashtra TimesZee Marathi Serial Update : झी मराठीच्या तारिणी, कमळी अन् सनई चौघडे मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर, या आठवड्यात घडणार बरंच काही

राम कपूरने लग्नातील फसवणुकीला ‘सामान्य’ म्हटले

अभिनेत्याने पुढे स्पष्ट केले, “कधीकधी, 20-25 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात चढ-उतार येतात. चांगले आणि वाईट टप्पे येतात. वाईट टप्प्यात जर एखादी चूक झाली आणि जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशिवाय किंवा मुलांशिवाय राहू शकत नसाल तर काळ सर्व काही सावरतो आणि कोणतीही गोष्ट नाते नष्ट करू शकत नाही. कधीकधी, हे अनावधानाने घडते. माफ करायचं”

आकांक्षा चमोलाची असहमती

मात्र, त्याच्या मतांना विरोध झाला. याच शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या अभिनेत्री आकांक्षा चमोलाने रामच्या दृष्टिकोनाला त्वरित असहमती दर्शवली. तिने असा युक्तिवाद केला की शारीरिक जवळीक कधीही ‘चूक’ म्हणून घडू शकत नाही, कारण त्यात अनेक जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांचा समावेश असतो आणि ती नेहमीच एक निवड असते, अपघात नाही.

Maharashtra TimesAtul Pethe : गावागावांत एसी बार, पण नाट्यगृहांना मुलभूत सुविधाही उपलब्ध होत नाहीत; रंगकर्मी अतुल पेठे यांचं वक्तव्य

राम कपूरवर लोकांची टीका

ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांनी आपापली मतं व्यक्त केली. अनेक लोकांनी रामच्या दृष्टिकोनावर टीका केली. एका सोशल मीडिया युझरने लिहिले, “मला असे ‘अनस्क्रिप्टेड’ शो आवडतात. ज्या लोकांचा आपण आदर करतो, त्यांची मानसिकता किती समस्याप्रधान असू शकते, हे त्यातून दिसून येते.” दुसऱ्या युझरने टिप्पणी केली, “राम कपूरचे डोके फिरले आहे.” तिसऱ्याने लिहिले, “मला वाटते राम कपूरने मानसिक संतुलन गमावले आहे.” आणखी एका युझरने म्हटले, “राम कपूरसारखे लोक ‘नार्सिसिस्ट’ (स्वतःच्याच प्रेमात मग्न असणारे) असतात, ज्यांना फसवणूक करणे योग्य वाटते. जर कुटुंब इतके महत्त्वाचे असेल, तर तुम्ही फसवणूकच का कराल?”

३ स्पर्धक सुरक्षित—कोण बाहेर पडणार?

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस वाढली आहे. या आठवड्यात आतापर्यंत सुनीता आहुजा, हर्षद चोपडा आणि आकांक्षा चमोला यांनी एलिमिनेशनपासून स्वतःचा बचाव करण्यात यश मिळवले आहे, तर उर्वरित स्पर्धक अजूनही सुरक्षित राहण्यासाठी धडपडत आहेत. आगामी भागात, फराह खान स्पर्धकांच्या कामगिरीचा आढावा घेईल आणि सुरक्षित झालेल्या आणखी काही स्पर्धकांची नावे जाहीर करण्यापूर्वी त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रतिक्रिया देईल.

‘लॉक अप: सच या सजा’ कधी आणि कुठे पाहाल?

फराह खान आणि रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालन असलेल्या ‘लॉक अप: सच या सजा’ या शोमध्ये अभिनेते, इन्फ्लुएन्सर्स आणि रिअ‍ॅलिटी टीव्ही व्यक्तिमत्त्व यांसारखे 15 सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी झाले आहेत. या शोचे नवीन एपिसोडमध्ये दर शनिवारी ते बुधवारी रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर रिलीज होतात.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा