Headlines

Pune News: पुण्यात रेल्वे फाटके हद्दपार! नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्गा बांधणार; कुठे-कसे असतील मार्ग?


Pune Railway Bridges: पुण्यात रेल्वे फाटकांमुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोकाही वाढतो. त्यामुळे हे मार्ग उभारणं महत्त्वाचं असून शहरात नऊ ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे.

पुणे रेल्वे पूल
प्रशांत अहेर, पुणे: पुणे शहरातील रेल्वे फाटकांमुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (महारेल) नऊ ठिकणी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी), भुयारी मार्ग ( आरयूबी) आणि पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येणार आहेत. महापालिकेने ‘महारेल’कडे प्राधान्यक्रमाची अंतिम यादी पाठविली असून, या प्रकल्पांचे सर्वेक्षण, आराखडे आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमातून ‘रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील १३१ रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. याशिवाय रेल्वे फाटक नसलेल्या मात्र वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या ८० ठिकाणांचाही या योजनेत समावेश करण्यात आला. या ८० पैकी चार ठिकाणे पुणे शहरातील होती. त्यात महापालिकेने आणखी पाच ठिकाणांचा समावेश केला. शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्याची विनंती ‘महारेल’चे महाव्यवस्थापक (नियोजन) जितेंद्रकुमार यांना महापालिकेने केली आहे.

Maharashtra TimesPune News: पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार

पूर्व पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा

हडपसर, घोरपडी, सासणेनगर, मांजरी, ससून रस्ता, रेंज हिल्स आणि खडकी परिसरात रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या लांब रांगा लागतात. नागरिकांचा वेळ वाया जातो. अनेकदा रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडकून पडावे लागते. प्रस्तावित उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक अधिक वेगवान होण्यास, इंधनाची बचत होण्यास आणि रेल्वे फाटकांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

निधीची जबाबदारी ‘महारेल’वर

या सर्व प्रकल्पांसाठी निधी ‘महारेल’ उभारणार आहे. त्यासाठी ‘हुडको’ किंवा अन्य संस्थांकडून वित्तपुरवठा केला जाईल. निधीची प्रमुख जबाबदारी ‘एमआरआयडीसी’कडे असून, महापालिकेवरील आर्थिक भार कमी होणार आहे. महापालिकेने दिलेल्या प्राधान्य यादीनुसार ‘महारेल’ प्रत्येक प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण, वाहतूक अभ्यास, तांत्रिक व्यवहार्यता अहवाल, प्राथमिक आराखडे आणि खर्चाचा अंदाज तयार करील. त्यानंतर रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामे सुरू होतील.

Maharashtra TimesPune Metro 3: ‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो’ची १२ स्थानकं तयार, डेडलाइनही उलटली; तरी उद्घाटन का रखडलं?

रेल्वे उड्डाणपूल

गोडबोले वस्ती -विलास वामन घुले रस्ता
सय्यदनगर-सासणेनगर
उद्योगनगर-गणपती चौक
पुणे-दौंड रेल्वे मार्ग, गेट क्रमांक २

रेल्वे भुयारी मार्ग

रेंज हिल्स शासकीय कुक्कुटपालन केंद्राजवळ
रेंज हिल्स (खडकी पोलिस ठाण्याजवळ)
काळे बोराटेनगर- पादचारी व दुचाकींसाठी भुयारी मार्ग
पंचशीलनगर – मीरानगर- पादचारी पूल

महाराष्ट्रात सर्वत्र रेल्वे अपघात कमी करण्यासाठी असे मार्ग बांधले पाहिजेता का? तुमचं मत कमेंट बॉकमध्ये नक्की सांगा

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा