Headlines

Pakistan Independence Day Chaos People Rush to Grab Giant Flag Themed Cake in Lahore | पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या केकवर लोक पडले तुटून, फाडले एकमेकांचे कपडे, पाहून हसून हसून वेडे व्हाल


Pakistan Flag Cake: पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात केक कटिंग केलं जाणार होतं. पण केक खाण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. अखेर ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि लोकांनी केकसाठी अक्षरशः हाणामारी केली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Pakistan Independence Day
(फोटो सौजन्य – @AMIT_GUJJU/x.com)
भारताप्रमाणे पाकिस्तानातसुद्धा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केला गेला. पाकिस्तानी लोकं एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. असो, तिथेही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनीदेखील राष्ट्रध्वज फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन देशाबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. पण याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील एका व्हिडीओनं मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. लाहोरमधील लिबर्टी गार्डनमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त एक भलामोठा केक ठेवण्यात आला होता. हा केक कापून स्वातंत्र्यदिन सेलिब्रेट करण्याचा तेथील राजकीय नेत्यांचा मनसुबा होता. पण घडलं भलतंच. लोकांनी कार्यक्रम सुरू होण्याआधीच तो केक पळवला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून जगभरातील नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत.

नेमकं काय घडलं?

​ ​

हा व्हिडीओ hamzavloger_120 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लिबर्टी गार्डनमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चांगली सजावट केली होती. लायटिंग वगैरे लावली होती. गाणी-डान्स, नाटकं असे काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार होते. तसंच, ज्या क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या बलिदानाला अभिवादन केलं जाणार होतं. पण लोकांना या गोष्टीशी काहीच घेणं-देणं नव्हतं. लोकं फक्त केक खाण्यासाठी गोळा झाली होती.

केकसाठी लोकांची तुफान गर्दी

लोकांनी हाणामारी सुद्धा केली

पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाच्या रंगातील मोठा केक त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. अन् लोकांची वाढती गर्दी पाहून केक कटिंग सोहळा वेळेआधीच सुरू झाला. अन् काय सांगता, लोकांनी अक्षरशः आयुष्यात कधीच केक पाहिला नसेल, अशा आवेशात मिळेल तितका केक पळवून नेला. लोकं अगदी कपड्यांमध्ये, खिशात, पिशव्यांमध्ये, टोपीमध्ये केक भरून पळ काढत होते. ही दृश्यं पाहून जगभरातील लोकं हैराण झाली आहेत. लोकं त्यांची खिल्ली उडवत आहेत. असो, तुम्ही देखील व्हिडीओ पाहा अन् सांगा, हा प्रकार पाहून तुमच्या डोक्यात कुठले विचार आले?

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा