Headlines

Operation Kagar: २२ माओवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडच्या ‘ऑपरेशन कगार’मधील मृतांची संख्या २६वर – operation kagar update security forces killed 22 maoists in karegutta chhattisgarh on 7 may pri


Operation Kagar: ‘ऑपरेशन कगार’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विशेष अभियानात सुमारे २४ हजार जवान सहभागी झाले आहेत. या अभियानात आजवर २६ माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे.

२२ माओवाद्यांना कंठस्नान.
२२ माओवाद्यांना कंठस्नान.(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: महाराष्ट्राच्या सीमेपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील करेगुट्टाच्या पहाडावर सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारी २२ माओवाद्यांना कंठस्नान घातले. ‘ऑपरेशन कगार’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विशेष अभियानात सुमारे २४ हजार जवान सहभागी झाले आहेत. या अभियानात आजवर २६ माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे. माओवाद्यांविरोधातील आजवरचे देशभरातील हे सर्वांत मोठे अभियान मानले जात आहे.

छत्तीसगडच्या बिजापूर आणि तेलंगणमधील मुलूग तथा भद्राद्री-कोठागुडेम परिसरात जवळपास आठशे चौरस किलोमीटरमध्ये करेगुट्टाचा उंच पहाड, घनदाट जंगलाचा परिसर आहे. अबुझमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये सुरक्षा दलांनी आक्रम भूमिका घेतल्यानंतर, करेगुट्टाच्या परिसरात माओवाद्यांनी तळ ठोकला. माओवाद्यांच्या सर्वांत मजबूत पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) बटालियन क्रमांक १चा हा सुरक्षित तळ मानला जातो. काही दिवसांपूर्वी तेलंगण राज्य समिती आणि दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचे पाचशेहून अधिक माओवादी आपल्या नेत्यांसह या भागात बैठकीसाठी एकत्र आले. यात प्रामुख्याने जहाल माओवादी हिडमा, पीएलजीए बटालियनचा कमांडर देवा, दामोदर, केंद्रीय समिती सदस्य चंद्रना, रामचंद्र रेड्डी, सुजातासह दंडकारण्य झोनल समितीचे नेते आणि माओवाद्यांच्या कंपन्यांचे कमांडर यांचा समावेश आहे.
Maharashtra Times‘ऑपरेशन सिंदूर’वर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा
याविषयीची माहिती मिळताच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्हा राखीव दल, बस्तर फायटर्स, छत्तीसगड पोलिसांचे एसटीएफ, सीआरपीएफ आणि ‘कोब्रा’चे जवान सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशीच्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. यानंतर जवानांनी नीलम सराय आणि धोबे पहाडावर तिरंगा फडकावला. पहाडावरील माओवाद्यांचे बंकर आणि गुफाही ताब्यात घेतली.

दोन दिवसांपासून पहाडावर आणि पायथ्याशी अभियान तीव्र करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत २२ माओवादी ठार झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. बस्तरमधील माओवादविरोधी अभियानात सुरक्षा दलाच्या जवानांनी मागील चार महिन्यांत १५१ जहाल माओवाद्यांना ठार मारले आहे.
Maharashtra TimesOperation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूरवर तेवढा आनंद किंवा समाधान नाही’, अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कल्याणच्या जवानाने गमावला पाय
करेगुट्टाच्या पहाडावर माओवाद्यांनी पेरून ठेवलेले आयईडी स्फोटके निष्क्रिय करीत असताना दोन जवान आणि कोब्रा बटालियनचे सहाय्यक कमांडंट सागर बोराडे (३३) जखमी झाले आहेत. कल्याणचे मूळ रहिवासी असलेले सागर यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत त्यांनी आपला पाय गमावला. माओवाद्यांनी पेरून ठेवलेली २५० आयईडी स्फोटके आजवर जवानांनी नष्ट केली आहेत.
Maharashtra TimesRaj Thackeray : ‘एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नाही, कारण…’; ऑपरेशन सिंदूरबाबत राज ठाकरेंचे विधान चर्चेत
अत्याधुनिक ड्रोनचा वापर
ऑपरेशन कगारमध्ये जवानांकडून अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जात आहे. या ड्रोनमध्ये पहाडावर फिरणारे माओवादी दिसून आले. यानंतर चकमक आक्रमक करण्यात आली. माओवाद्यांविरोधातील हे अभियान आता निर्णायक टप्प्यावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पहाडावर स्थायी तळ उभारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. परत माओवादी करेगुट्टात येऊ नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या अनुषंगाने आवश्यक सामग्री परिसरात पाठविण्यात येत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा