Headlines

Omraje nimbalkar spoke emotionally about eknath shinde shivsena entry and uddhav thackeray; मी विष पचवलं, १० दिवसांत जेवढी टीका झाली तेवढी दुसरा कोणी सहन करू शकला नसता; ओमराजे भावुक


धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मागील काही दिवसांपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आज ओमराजे यांनी आपली बाजू मांडत पक्षांतराचा निर्णय का घेतला, याबाबतचा खुलासा केला आहे. तसंच पक्षांतराचा निर्णय घेणं म्हणजे विष पचवण्यासारखं आहे, असं म्हणत ओमराजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

पक्षांतरावरून होणाऱ्या टीकेबद्दल प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मी हा जो निर्णय घेतलाय, ते म्हणजे विष पचवण्यासारखं आहे. मागच्या १० दिवसांत माझ्यावर जी टीका होतेय, ती कोणत्याही सामान्य माणसाला सहन होणारी नाही. ते मी सगळं सहन केलं आहे. मला माझ्या जिल्ह्यावरचा मागासलेपणाचा शिक्का पुसून काढायचा आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले ओमराजे?

ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याबाबत बोलताना ओमराजे म्हणाले की, “उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीबद्दल माझ्या मनात जो आदर आहे, तो कायमस्वपरुपी असणार आहे. मी हा निर्णय घेत असताना जी कारणमीमांसा केली आहे, त्यातही मी कुठेही त्यांच्यावर दोषारोप केलेले नाहीत. मी माझ्या मतदारसंघातील लोकांना ज्या अडचणी येत होत्या, त्यासाठी हा निर्णय घेतला आहे. किती दिवस आम्ही म्हणायचं की हा मागासलेला मतदारसंघ आहे, मागासलेला जिल्हा आहे. हा शिक्का पुसून काढण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे.”

“माझ्यावर जी टीका होत आहे, आज माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त होत आहेत, त्या माझ्यावर असणाऱ्या प्रेमामुळे व्यक्त होत आहेत. मला वाटतंय की माझ्यावर होत असलेल्या टीकेला मी कामातून उत्तर देईन. जे लोक मी खोक्यासाठी किंवा पैशांसाठी हा निर्णय घेतला आहे म्हणत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, पैशांसाठी जायचं असतं तर मी २०२२ लाच गेलो असतो. मी चार वर्षे वाया का घालवली असती?” असा सवाल ओमराजेंनी केला आहे.

राणा पाटलांवर निशाणा

यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी आपले पारंपरिक विरोधक आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. “मला धाराशिव मतदारसंघातील लोकांना सांगायचं आहे की, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हा निर्णय मी वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला नाही. सर्वसामान्य माणसाची जी कुचंबना होत होती, जी अवहेलना होत होती, त्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मंत्रिपद वगैरे मिळावं, यासाठी मी निर्णय घेतलेला नाही. काही मंडळी सगळ्या सत्ताधारी पक्षांकडून फायदा घेऊन एकाधिकारशाही चालली होती, विरोधकांना चिरडण्याचं काम चाललं होतं, ते आता थांबवलं जाईल,” असा विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत