Nitin Gadkari’s big statement; Electric car prices will increase by this in 6 months; नितीन गडकरींचं मोठी वक्तव्य! 6 महिन्यांत इलेक्ट्रिक कारच्या किमती इतक्या वाढणार, जाणून घ्या सविस्तर
Nitin Gadkari’s big statement; Electric car prices will increase by this in 6 months; नितीन गडकरींचं मोठी वक्तव्य! 6 महिन्यांत इलेक्ट्रिक कारच्या किमती इतक्या वाढणार, जाणून घ्या सविस्तर
आता देशातील लोकांमध्ये इलेक्ट्रिक कारची क्रेझ दिसून येत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कारच्या किमती वाढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
एकीकडे, देशात टेस्लासारख्या इलेक्ट्रिक कारच्या येण्याची चर्चा सुरु आहे. त्याच वेळी, मारुती सुझुकी इंडियापासून ते ह्युंदाई मोटर इंडियापर्यंत, सर्वच आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहे. एवढेच नाही तर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या भारतीय कार कंपन्यांनी आधीच इलेक्ट्रिक कारमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक कारच्या किमतींबाबत मोठी घोषणा केली आहे. नेमकं काय म्हणाले गडकरी या बातमीमधून सविस्तर जाणून घेऊया.
नेमकं काय म्हणाले गडकरी?
नितीन गडकरी म्हणाले की, 6 महिन्यांत देशातील पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारच्या किमती जवळजवळ सारख्याच होतील. 32 व्या कन्व्हर्जन्स इंडिया आणि 10 व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी हे सांगितले.
सध्या इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोल कारपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक कार चालवण्याचा आणि Maintance चा खर्च कमी असला तरी, याची अपफ्रंट कॉस्ट वाढत आहे. इलेक्ट्रिक कारची किंमत ही देखील ईव्ही स्वीकारण्यात एक मोठी अडचण आहे.
देशात होणार मोठे बदल
नितीन गडकरी म्हणाले की, “सहा महिन्यांत ईव्हीची किंमत पेट्रोल वाहनांच्या किमती इतकी होईल.” तसेच, सरकार देशाची इंपोर्ट कमी करण्यासाठी पर्यायांवर काम करत आहे. म्हणूनच देशात ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले जात आहे जेणेकरून पेट्रोलियम इंपोर्ट बिल कमी करता येईल.
याशिवाय, नितीन गडकरी म्हणाले की, 210 किमी लांबीच्या दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेचे बांधकाम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. एवढेच नाही तर, सरकार किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी प्रोडक्शन वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून देशाचे इंपोर्ट बिल कमी करता येईल.
चांगले रस्ते खर्च कमी करतील
नितीन गडकरी म्हणाले की, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. देशात चांगले रस्ते बांधून लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करता येतो. सरकार स्मार्ट शहरे आणि स्मार्ट वाहतुकीसाठीही काम करत आहे. असो, जर देशात चांगले रस्ते बांधले गेले तर ते सामान्य लोकांसाठी देखील फायदेशीर आहे. हे कार आणि इतर वाहनांची इंधन बचत सुधारण्यासाठी नक्कीच काम करेल.
लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.
प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.
गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.
हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात.… आणखी वाचा