Headlines

NCP Leader Praful Patel Important Statement on Ajit Pawar Plane Crash Case


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावर होत असलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अपप्रचार केला जात असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

Praful Patel
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात याबाबत पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला आणि त्यामुळे अजित पवार यांना उशिर झाला, कुणाच्या तरी फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार थांबले होते. त्यामुळे अजित पवार यांचा त्या दिवशी रस्ते मार्गाने बारामतीला जाण्याचा निर्णय रद्द झाला, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. या आरोपांनंतर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यावर भाष्य केलं आहे.

“उगीच अपप्रचार केला जात आहे. अपघात झाला त्याच दिवशी स्वत: केंद्रीय विमान वाहतूक मंत्री बारामतीला पोहोचले, त्यांनी एअर क्राफ्ट एक्सिडेंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो AAIB ही स्वायत्त संस्था आहे, त्यांना तपासासाठी सूचना केली, अधिकार दिला. काही दिवसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी सुद्धा जाहीर केली. त्यामुळे दोन्ही यंत्रणा कामाला लागली होती. परत आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

‘मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अजित दादांना फोन केला’

“लोकांना माहिती नसेल. मी परत-परत सांगतो. अजित दादा आणि माझ्यात शेवटच्या फोनबाबत काही लोकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीवरुन फोन केला. अजित दादा कोणत्या शहरात आहेत ते मला माहिती नव्हतं. मी फक्त त्यांना लक्षात आणू देऊ इच्छित होतो की, आमच्या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांचे शासकीय धान खरेदी झाली आहे त्याचे पैसे पेंडिंग आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पेमेंट काढावेत ही माझी सूचना होती. त्याप्रमाणे त्यांनी पुढची कारवाई केली ते मला माहिती नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Praful Patel

‘हे अतिशय दुर्दैवी’

“लोक म्हणतात की, कुठली राईस मीलची फाईल, ही अतिशय चुकीची बाब आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फोन केला. अजित दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री होते त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी फोन करणं हे माझं कर्तव्य होतं. ते मी करत होतो. माझ्यामुळे ते उशिरा गेले असे सांगण्याचे प्रयत्न काही लोकं करत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. अपघात झाल्याने आम्हाला, महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा आघात आणि धक्का बसला आहे. पण या अशा सामान्य लोकांच्या कामांसाठी फोन केला त्याबाबत तुलना करुन अशा प्रकारे चुकीचा प्रचार करणं हे खेदजनक आहे”, अशी खंत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.

Praful Patel

“सत्य समोर आलं पाहिजे. चौकशी पूर्ण आणि निष्पक्ष झाली पाहिजे. अजित दादा यांच्या जाण्याने कुटुंबाचं नुकसान झालंच आहे, पण महाराष्ट्र आणि देशाचं देखील खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूर्ण सत्य समोर यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार”, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी मांडली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा