Headlines

NCP Candidate List: ताटातलं वाटीत आलं अन् आमदाराचं तिकीट गेलं; दादांचा निष्ठावंताला धक्का, पटेलांचा पुन्हा डाव – maharashtra vidhan sabha nivadnuk ncp candidate list rajkumar badole gets candidature ajit pawar drops sitting mla


राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांनी जवळपास सगळ्याच आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पण अर्जुनी मोरगावचे आमदार चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं आहे.

badole
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गोंदिया: महायुतीमधील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजप , शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादीची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यात ३८ जणांचा समावेश आहे. शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुती सरकारमध्ये गेलेल्या जवळपास सगळ्याच आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे. पण अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जागी काल पक्षात आलेल्या राजकुमार बडोलेंना संधी देण्यात आली आहे.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कालच राष्ट्रवादीत प्रवेश केला. फडणवीस सरकारच्या काळात बडोले यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार होता. २०१९ मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे अवघ्या ७१८ मतांनी विजयी झाले. आता त्याच चंद्रिकापुरेंचा पत्ता कापून बडोलेंनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवली आहे.
Maharashtra TimesAjit Pawar: शिंदे, फडणवीसांची अजित पवारांशिवाय बैठक; दादांना भाजपकडून ‘मेसेज’; DCM तातडीनं दिल्लीला
अर्जुनी मोरेगाव मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल पटेल याच जिल्ह्यातून येतात. चंद्रिकापुरेंना गेल्या वेळी तिकीट मिळवून देण्यात पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. आताही राजकुमार बडोलेंच्या पक्षप्रवेशात आणि त्यांना तिकीट देण्यात पटेल यांनी भूमिका पार पाडली आहे. बडोलेंच्या पक्षप्रवेशावेळी पटेल त्यांच्या अगदी शेजारीच उभे होते.
Maharashtra TimesMVA Seat Sharing: ये बंदा लई जोरात, मविआला पावले थोरात; जागावाटप ठरलं; काँग्रेस, ठाकरे, पवारांना किती जागा?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९९९ आणि २००४ मध्ये अर्जुनी मोरगावातून पक्षाचा उमेदवार विजयी झाला. पण २००९ आणि २०१४ मध्ये भाजपच्या बडोलेंनी बाजी मारली. २०१९ मध्ये त्यांचा विजय अगदी थोडक्यात हुकला. आता तर विद्यमान आमदाराला डावलून त्यांना संधी देण्यात आलेली आहे. चंद्रिकापुरेंबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे. शेती, विजेशी संबंधित प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत. त्यांचा जनसंपर्कही फारसा नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिल्यास पराभव होईल असे अहवाल राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळेच त्यांना डच्च देण्यात आला आहे. बडोले भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानं ताटातून वाटात गेल्याची चर्चा आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा