Navi Mumbai Politics: उद्घाटनाच्या श्रेयवादावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, या अन्यायाविरोधात आता शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आमदार म्हात्रे यांच्या मते, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार निधीचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळणे राजशिष्टाचाराला धरून नाही, असे त्या म्हणाल्या. या मुद्द्यावरून त्यांनी महापालिका प्रशासनासह, सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि मंत्री गणेश नाईक यांना लक्ष्य केले. वाशी येथील महापालिका रुग्णालयात उभारण्यात आलेल्या रुग्णसुविधांचे लोकार्पण करण्यासाठी आलेले वनमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्यासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच, भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.
Devendra Fadnavis : ‘तू घेतलेली मुलाखत मला कायम लक्षात राहील’, चिमुकल्या मुलीच्या इंटरव्ह्यूने मुख्यमंत्री भारावले
‘हा महापौरांचा अधिकार’
‘महापालिका ही लोकशाहीत एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा कोणाला खूश करण्यासाठी नियमांना बगल दिली जाऊ शकत नाही’, असे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून विरोधकांनी केलेले सर्व आरोप पुराव्यांसह फेटाळून लावले. यासोबतच, विरोधकांचे आंदोलन हे केवळ राजकीय अज्ञानातून सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेला डावलले जात असल्याचा आरोप खोडून काढताना महापौरांनी थेट शासन निर्णयाची प्रतच प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार, महापालिका क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये स्थानिक सन्माननीय विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांना आमंत्रित करणे बंधनकारक असते. याच नियमाचा आदर ठेवून निमंत्रण पत्रिकेत खासदार आणि स्थानिक आमदार यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची नावे सन्मानाने छापण्यात आली आहेत’, असे त्या म्हणाल्या.
Jayant Patil: राज्यातील स्मार्ट मीटर योजनेला स्थगिती द्या! जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सरनाईक यांची संतप्त प्रतिक्रिया
नवी मुंबई महापालिकेच्या विकास कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रणापासूनदेखील शिंदे यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते. त्या आदेशाला ७२ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा एकदा पालकमंत्री शिंदे यांचे नाव नवी मुंबई महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.

