Nashik News: सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात.

या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरात २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंदची घोषणा करण्यात आली आहे. हा संप आज (दि. ४) सकाळी ६ वाजता सुरू होऊन उद्या (दि. ५) सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया तरीही सुरूच राहिली तर हे सेवाबंद आंदोलन अनिश्चित काळासाठी पुढे चालवले जाईल, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनांनी दिला आहे.
Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात मच्छिमारांचा संताप; थेट बडतर्फची मागणी, मोठं नुकसान झाल्याचा आरोप
बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांना अॅलोपथीच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देणे हे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला छेद देणारे असल्याची या संघटनांची भूमिका आहे.
यासंदर्भात संबंधित शासकीय विभाग व मंत्रालयाकडे अनेकदा निवेदने, पत्रव्यवहारांद्वारे चिंता व्यक्त करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक हितासाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय पद्धतींचे मानदंड जपण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे ‘आयएमए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आंदोलन रुग्णांच्या विरोधात नाही. तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मानदंडांच्या संरक्षणासाठी असल्याचेही आयएमएने नमूद केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई व राज्य खजिनदार डॉ. अमोल गिते यांची स्वाक्षरी आहे.
Girish Mahajan : कथित ऑडिओ क्लिपमध्ये खडसे कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह शब्द, पत्रकारांची विचारणा, गिरीश महाजन यांचा काढता पाय
पेपरफुटीची शिष्पक्ष चौकशी करा
नाशिक : स्पर्धा परीक्षा पेपरफुटीची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संघटनेने सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन दिले. नीट, टीईटी, एमएच सीईटी तसेच एमपीएससीसह विविध भरती परिक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटीचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये असंतोष आहे. शिक्षणव्यवस्था तसेच स्पर्धा परीक्षेवरील विश्वास डळमळीत होत असल्याने या सर्व गैरव्यवहारांची निष्पक्षपणे चौकशी करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पेपरफुटीत सहभागी अधिकारी, कर्मचारी, दलाल, खासगी संस्था व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी. दोषी परीक्षा केंद्र काळ्या यादीत टाकावे, पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक सुरक्षा व्यवस्था लागू करावी, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी यंत्रणा स्थापन करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

