Headlines

nandurbar man ends life due to debt pressure from finance company tragic incident; थकित हप्त्यासाठी फायनान्स कंपनीचा तगादा, सतत फोन; तणावातून तरुणाचा टोकाचा निर्णय; शहरात हळहळ


Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने सततच्या कॉलला कंटाळून एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. फायनान्स कंपनीकडून वारंवार येणाऱ्या फोनमुळे तणावातून तरुणाने गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

nandurbar news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : शहरात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका तरुणाने वाहनासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज घेऊन त्याने वाहन खरेदी केलं होतं. ते वाहन नोटरी करून दुसऱ्याला चालवण्यास दिलं. परंतु वाहनाचे दोन हप्ते थकले होते. वाहनासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून वारंवार येणाऱ्या फोनमुळे तरुणाने तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा (खांडबारा) येथे घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज थकलं, सततच्या फोनला कंटाळून तरुणाचा टोकाचा निर्णय

नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा (खांडबारा) येथील जावेद खान अहमदखान पठाण (34) याने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन चारचाकी वाहन (क्रमांक एमएच ३९ एडी २७४०) घेतलं. त्यानंतर जावेदखान यांनी त्यांचं चारचाकी वाहन वाहन नोटरी करून जाकीरशेख मुनाफ, रा. नवापूर यांना वापरण्यासाठी दिलं होतं.
Maharashtra TimesBeed News : 8 जण राक्षस झाले, संतोष अण्णाला मार-मार मारलं; काळीज पिळटवून टाकणारे Video दाखवताच पत्नी अन् भावाने हंबरडा फोडला, कोर्टात काय घडलं?

वारंवार फोन, सततच्या फोनला कंटाळून भावाच्या घरी संपवलं जीवन

त्या वाहनासाठी घेतलेल्या कर्जाचे दोन हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून अय्यूब खान पठाण हा वारंवार फोन करत होता. वारंवार फोन येत असल्याने तणावातून जावेद खान अहमद खान पठाण याने भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सतत फोन करुन कर्जाचे हप्ते भरण्याच्या तगाद्याला कंटाळून तरुणाने आयुष्याची अखेर केली.

जीबीएसचा नंदुरबार जिल्ह्यात शिरकाव, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

याप्रकरणी वसीम खान पठाण यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अय्यूबखान जलीलखान पठाण आणि जाकीरशेख मुनाफशेख रा. नवापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4),108,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वडघुले करत आहेत. या प्रकरणाने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या अशाप्रकारे जाण्याने संपूर्ण शहरात, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.आणखी वाचा