Headlines

Nanded Legislative Council Election Results BJP Candidate Amar Rajurkar Wins Krishna Patil Ashtikar Defeated; पक्षादेशामुळे ऐनवेळी काँग्रेसची माघार, पण बापाच्या निर्णयाचा फटका पोराला बसला; ठाकरेसेनेच्या कृष्णा पाटील आष्टीकरांचा दारुण पराभव


Nanded Krishna Patil Ashtikar : आज नियोजन भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मते मिळाली, कृष्णा आष्टीकर यांना 84 मते आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांना केवळ 5 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे अमर राजुरकर यांनी निवडणूक जिंकून हॅट्रिक साधली आहे.

Nanded Krishna Patil Ashtikar
नांदेड कृष्णा पाटील आष्टीकर पराभूत(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बंडामुळे राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले खासदार आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांचा दारुण पराभव झाला आहे. आष्टीकर यांना केवळ 84 मते मिळाली आहेत. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू तथा भाजप उमेदवार अमर राजुरकर यांनी 339 मते मिळवत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. शिवाय 23 मते बाद झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, या निवडणुकीत मुलाचा पराभव हा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

शेवटच्याक्षणी पक्षाच्या आदेशामुळे माघार

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 452 नगरसेवक मतदारांपैकी 451 जणांनी मतदान केले. महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील आष्टीकर, महायुतीकडून अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजुरकर आणि वंचितकडून नगरसेवक प्रशांत इंगोले हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सुरुवातीपासून नांदेडची निवडणूक चर्चेची ठरली होती. काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेल्या रामदास पाटील सोमठाणकर यांना शेवटच्या क्षणी पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. तर अपक्ष अर्ज दाखल केलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील यांना महाविकास आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आले.

Maharashtra TimesGokul Gite : नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?
दरम्यान, आज नियोजन भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मते मिळाली, कृष्णा आष्टीकर यांना 84 मते आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांना केवळ 5 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे अमर राजुरकर यांनी निवडणूक जिंकून हॅट्रिक साधली आहे. 2010 मध्ये काँग्रेसमध्ये असताना त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये 43 मतांनी विजय मिळवला होता. दरम्यान, अमर राजुरकर पहिल्यांदा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आजच्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला.

‘ऑपरेशन टायगर’चा आष्टीकरांना फटका

काँग्रेसकडे 92 संख्याबळ असताना 19 संख्याबळ असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला नांदेडची जागा सुटली. त्यामुळे उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसचे रामदास पाटील सोमठाणकर यांना माघार घ्यावी लागली. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चूरस निर्माण झाली असताना मतदानाच्या दोन दिवसापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरु झाली आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या धडकल्या. त्यामुळे काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नगरसेवक संभ्रमात पडले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची देखील धाकधुक वाढली होती. आपला विजय निश्चित असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णा पाटील आष्टीकर यांना मात्र ‘ऑपरेशन टायगर’मुळे फटका बसला. अपेक्षेप्रमाणे 84 मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली. मुलाचा पराभव खासदार पित्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra TimesSuhas Shirsath : भाजपकडून अंबादास दानवेंना ‘दे धक्का’, छ. संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीत सुहास शिरसाठांची बाजी; कुणाला किती मते मिळाली?

काँग्रेसची मतं फुटली

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील मतफुटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीकडे शेकडोच्या संख्येने संख्याबळ असताना कृष्णा पाटील यांना केवळ एवढीच मते मिळाली. काँग्रेसकडे 92 , तर शिवसेना ठाकरे गटाकडे 19 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 23 असे एकूण 134 मतदार आहेत. तरी देखील उमेदवाराला शंभरी आकडा गाठता आला नाही. तेव्हा काँग्रेसची मते फुटल्याची जोरदार चर्चा आहे. अनेकांनी भाजप उमेदवाराला साथ दिल्याची देखील चर्चा आहे. या मत फुटीनंतर काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा