उदाहणार्थ समजा दोन अगदी सारखे अपार्टमेंट्स आहेत – ज्यांचे आकारमान, सुविधा आणि बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) एकसारखेच आहेत. पण एक ठिकाण मेट्रो स्टेशनपासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे तर, दुसरे ठिकाणावरून जवळच्या मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी रिक्षाने 20 मिनिटे लागतात. मग तुम्हाला काय वाटत कुठं जास्त खर्च करावा लागेल?
US Tariff Threat: 500% शुल्क नको, पण 100% टॅरिफ तर द्यावाच लागेल! रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेची भारतावर कारवाई
10 वर्षांपूर्वी याचे उत्तर कदाचित त्या परिसराच्या टपाल पत्त्यावर अवलंबून असते तर, आता एकच उत्तर असेल ते म्हणजे की कामाच्या ठिकाणी पोहोचायला किती मिनिटे लागतात. मुंबई सारख्या महानगरात हा बदल गेल्या काही वर्षांपासून स्पष्ट दिसून येत आहेत.
मेट्रो कनेक्टिव्हीटी घर खरेदीचे फॅक्टर
मुंबईचा रिअल इस्टेट बाजार आता ‘कनेक्टिव्हिटी-अडजस्टेड व्हॅल्यू’कडे वाटचाल करत आहे. म्हणजे एकेकाळी केवळ दक्षिण मुंबई किंवा आसपासच्या भागात फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदीसाठी लोक अधिक किंमत मोजायचे. पण आता अनेकदा पहिला प्रश्न एकच प्रश्न विचारला जातो की येथून ऑफिस, विमानतळ किंवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) गाठायला किती वेळ लागतो?
मुंबईत बनतेय मेट्रोचे जाळे
महानगरात मेट्रो जाळे विस्तारत आहे ज्यामध्ये सुरू असलेल्या ‘लाइन 3’ आणि ‘लाइन 7’ यासारख्या नवीन मार्गिका जोडल्या जातील, जो या बदलाचा मुख्य घटक आहे. एकेकाळी शहराच्या परिघावरील भाग मानल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये या मेट्रो मार्गांमुळे पूर्णपणे नवीन निवासी आणि व्यावसायिक मायक्रो-मार्केट्स विकसित होत आहेत.
पायाभूत सुविधांसोबत इतर सुधारणाही जोडीला येत असल्यामुळे या मेट्रो मार्गांमुळे काही मार्गांवर गर्दीच्या वेळी (पीक-आवर) प्रवासाचा वेळ तब्बल 60 ते 70 मिनिटांनी कमी झाला आहे. मेट्रो मार्ग 3 आणि बीकेसीशी सुधारलेली कनेक्टिव्हिटी-व्यवस्थेच्या बळावर मध्य मुंबईत सुमारे 50 लाख चौरस फूट क्षेत्राचा नवीन ग्रेड-ए दर्जाचा कार्यालयीन प्रकल्प उभारला जाऊ शकतो.
मेट्रो कनेक्टिव्हिटीचा किमतींवर परिणाम
लक्षात घ्या की केवळ घर खरेदीसाठी मेट्रोला पसंती मिळणारा मुंबई एकमेव शहर नाही. गुडगाव देखील याचं उत्तम उदाहरण आहे. काही दशकांपूर्वी गुडगाव एक शांत उपनगर होते पण, IT क्षेत्राची वाढ आणि दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख ठिकाणांशी गुडगावला कनेक्ट करणाऱ्या मेट्रो सेवेचा विस्तार झाल्यानंतर आता हे शहर रिअल इस्टेटच्या प्रमुख केंद्रापैकी बनले आहे.
अशाप्रकारे, दळणवळण सुविधा सुधारतात तेव्हा मालमत्तेचे कितपत वाढू शकते याचे गुडगाव आणि मुंबई सध्या एक उत्तम उदाहरण आहे. तसेच मुंबई आणि गुडगावचे उदाहरण एका व्यापक तत्त्वाकडे लक्ष वेधते. यानुसार प्रवासाला लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेणं कठीण नाही तर, मोजता येण्याजोगा मापदंड बनला असून खरेदीदार मोठ्या प्रमाणात विमानतळ किंवा ऑफिसपर्यंत पोहोचायला लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेसारख्या ठोस आकड्यांच्या आधारावर परिसरांची तुलना करत आहेत.

