Mumbai Chembur Tree Collapse 11 Year Old Vihan Srivastava Dies Father Fight Legal Battle; घरी जाताना झाड कोसळून विहानचा करुण अंत, चेंबूरमध्ये प्राण गमावलेल्या लहानग्याच्या वडिलांकडून कार्यवाही; थेट भाष्य केलं
Mumbai Chembur Tree Collapse 11 Year Old Vihan Srivastava Dies Father Fight Legal Battle; घरी जाताना झाड कोसळून विहानचा करुण अंत, चेंबूरमध्ये प्राण गमावलेल्या लहानग्याच्या वडिलांकडून कार्यवाही; थेट भाष्य केलं
Chembur School Bus Accident Vihan Death Case : मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ते आता कायदेशीर लढाई लढणार आहेत.
विहान श्रीवास्तव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव (वय ११) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फेरचौकशीसाठी मुंबई महापालिकेने एकसदस्यीय समिती नेमली आहे. मात्र समितीच्या अहवालातून काही ठोस निष्प्पन्न होईल का, याबाबत विहानचे वडील गौरव श्रीवास्तव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना साशंकता व्यक्त केली. ‘आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्लाही घेत असून लवकरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
पहिला अहवाल अमान्य
चेंबूर दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीसाठी महापालिका प्रशासनाने प्रारंभी दोन उपायुक्तांची समिती गठीत केली होती. या समितीने सादर केलेला सविस्तर अहवाल महापौर रितू तावडे तसेच महापालिका सभेने अमान्य केला होता. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अहवालात सखोल तपास व कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच त्रयस्थ तज्ज्ञाची नेमणूक करून फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले होते. फेरचौकशीसाठी महापालिकेने ३० जुलैला प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख यांची एक सदस्यीय समिती नेमली. प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख हे वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी कांदळवनांबाबत भरीव कार्य केले असून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही जबाबदारी भूषवली आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई) येथे अधिवक्ता प्राध्यापक तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे उपाध्यक्ष आहेत.
या घडामोडींबाबत विहान श्रीवास्तव याचे वडील गौरव श्रीवास्तव यांनी भाष्य केले. ‘महापालिकेकडून नियुक्त एक समिती सदस्य डॉ. देशमुख यांच्या पात्रतेबद्दल बिलकुल शंका नाही. मात्र ही चौकशी समिती केवळ झाड कसे पडले हे स्पष्ट करण्यासाठी आहे की, या घटनेला जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्यासाठी आहे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक सदस्य समितीच्या वैधतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘यापूर्वीच्या समितीत दोन सदस्य होते. तरीही अहवाल अमान्य झाला. सध्याच्या समितीत एकच तज्ज्ञ आहेत.
‘लवकरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेऊ’
समितीत निवृत्त न्यायाधीशांसोबत इतर तज्ज्ञांचाही समावेश असायला हवा होता. केवळ एका सदस्याच्या समितीची नियुक्ती कशी समर्थनीय आहे? असा प्रश्नही त्यांनी केला. आगामी अहवालातून काही ठोस निष्पन्न होईल का, याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली. ‘याआधी सादर झालेल्या अहवालातील मुद्दे पाहता, त्यावर आम्ही कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेत आहोत. लवकरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेऊ,’ असे गौरव श्रीवास्तव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे बोलताना स्पष्ट केले. नवीन अहवालासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. त्या अहवालाची वाट पाहावी की नाही, याबद्दल कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
चेंबूरमध्ये झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी दोन उपायुक्तांची समिती नेमून चौकशी करण्यात आली. त्यांनी आपला अहवाल मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर केला. यामध्ये रस्ते विभाग, तसेच उद्यान विभागाला क्लीनचिट देण्यात आली. तर रस्ते कंत्राटदारासह कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागाराला किरकोळ दंड आकारण्यात आला होता. या प्रकरणी आधीच मुंबई महापालिकेकडून रस्ते विभागातील दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा