Gadchiroli Police Action Against Maoist : माओवादी केंद्रीय समिती सदस्य गजारला रवी आंध्र प्रदेशात चकमकीत मारला गेला. त्याचा भाऊही चकमकीत मारला गेला होता, तर दुसर्या भावाने आत्मसमर्पण केले होते. रवी 1990 पासून माओवादी चळवळीत सक्रिय होता. त्याने अनेक हिंसक घटनांमध्ये सहभाग घेतला होता. पंजाब कमांडोंवरील हल्ल्यातही तो सामील होता. त्याच्या मृत्यूने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश तिवारी, गडचिरोली : माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य गजारला रवी आणि त्याचे दोन भाऊ माओवादी चळवळीत सक्रिय होते. मोठा भाऊ 15 वर्षांपूर्वी चकमकीत ठार झाला. लहान भावाने आत्मसमर्पण केले. या घटनांनतर रवीही आत्मसमर्पण करणार, असा विश्वास त्याच्या कुटुंबीयांना होता. पण, आत्मसमर्पणाऐवजी तो चळवळीत सक्रिय राहिला. बुधवारी आंध्र प्रदेशातील चकमकीत तो ठार झाल्याने कुटुंबीयांची इच्छा अधुरीच राहिली. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या सीमेपासून 50 किलोमीटरवर दूर अंतरावरील तेलंगणच्या जयशंकर भोपालपल्ली जिल्ह्यातील वेलिशाला हे गजारला रवी याचे मूळ गाव आहे. रवीचा मोठा भाऊ गजारला सारय्या उर्फ आझाद आणि गजारला अशोक उर्फ ऐतू हे दोघेही १९९०च्या सुमारास पीपल्स वॉर ग्रुप संघटनेत दाखल झाले होते. सारय्या हा एटूरनागारमच्या जंगलात आंध्र प्रदेश पोलिसांशी झालेला चकमकीत ठार झाला होता. तर अशोक हा तब्बल 25 वर्षे गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. लाहेरीतील 17 जणांच्या हत्याकांडासह अनेक जवानांच्या हत्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेला अशोकने तेलंगणा पोलिसांसमोर 6 वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केले होते. सध्या तो काँग्रेस पक्षात सक्रिय आहे.
रवी गजारला हा तत्कालीन पीपल्स वॉर ग्रुप या संघटनेत १९९०मध्ये सक्रिय झाला. संघटनेत गणेश आणि उदय या नावाने त्याला ओळखले जाऊ लागले. महादेवपूर एरिया समितीचा सचिव म्हणून सक्रिय असताना महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर झालेल्या माओवाद्यांच्या अनेक हिंसक घटनांमध्ये रवीने सक्रिय सहभाग नोंदविला. या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या सुरक्षेसाठी पंजाब कमांडोंना बोलविण्यात आले होते. रवीच्या नेतृत्वात पीपल्स वॉर ग्रुपच्या माओवाद्यांनी सिरोंचा तालुक्याच्या सीमेपासून आठ किलोमीटर अंतरावरील मेडीगड्डालगतच्या लेकलगड्डा येथे भूसुरूंग स्फोट घडवून आणत पंजाब कमांडोंच्या कमांडंटसह 8 जवानांना ठार मारले होते.
रवीच्या नेतृत्वात ही घटना घडविण्यात आली होती. खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पंजाब कमांडोची फोर्स तयार करण्यात आली होती. त्यांच्यावरच घाव घालण्यात आल्याने तत्कालीन पंजाब पोलिसांचे प्रमुख असलेले केपीएस गिल यांनी थेट महाराष्ट्र-तेलंगण सीमा भागाला भेट देऊन लेकलागड्डामधील घटनास्थळाची पाहणी केली होती. केपीएस गिल यांच्या सूचनेनंतर गजरला रवीसाठी गोदावरी नदीलगत असलेल्या दोन्ही बाजूचा जंगल पंजाब कमांडोंच्या जवानांनी पिंजून काढला होता. पण, तो त्यांना गवसला नव्हता. सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली पोलीस ठाणे २००० साली माओवाद्यांनी लुटले होते. माओवाद्यांनी लुटून नेलेले ते महाराष्ट्रातला पहिले पोलिस ठाणे होते. या घटनेत रवीने सक्रिय भूमिका बजावल्याची माहिती आहे.
भूसुरूंग स्फोटांचा ‘मास्टरमाइंड’
प्राणहिता, गोदावरी या दोन नद्यांच्या सीमेवर असलेल्या सीमावर्ती भागात माओवाद्यांसाठी विशेष रणनीती तयार करण्यासह संघटनेला मजबुती देण्यामध्येही गजरला रवीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भूसुरुंग स्फोटाच्या घटनांमध्ये रवी हा तज्ज्ञ म्हणून ओळखला जायचा. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या करीमनगर, वारंगल, आदिलाबाद, खम्मम या उत्तर तेलंगणच्या तीन जिल्ह्यांमध्ये पीपल्स वॉर ग्रुप या संघटनेत रवीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
दंडकारण्यात स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढविण्यामध्ये रवीची मोठी भूमिका होती. २००४ मध्येही माओवाद्यांनी तत्कालीन वायएस राजशेखर रेड्डी यांच्यासोबत केलेल्या चर्चेमध्येही रवी प्रत्यक्ष सहभागी झाला होता. माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून बढती मिळाल्यानंतर त्याच्याकडे आंध्र प्रदेश, ओडिशाच्या सीमावर्ती भागाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून चकमकीपर्यंत गजरला रवी याच भागात सक्रिय होता. त्याच्या मृत्यूने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा