![]()
Marathi News Live: पेपरफुटी रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला कायदा आता कठोर करण्यात येणार असून, सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्यासह जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि वाढीव शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. ‘तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे. या देशात लोक शिल्लक नाहीत, आहेत ती झुरळे आहेत याच भ्रमात सत्ताधारी वागत होते. मात्र आता एका झुरळाने हुकूमशहाला झुकविले आहे’, अशा शब्दांत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरीही आज, रविवारचा तिरंगा मार्च होणारच आहे, असे मनसे अध्यक्ष राज आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Source link
Maharashtra Live News 26th July 2026: नाशिक जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; विविध तालुक्यांत हादरे, जीवित-वित्तहानी नाही
