Headlines

Latur Kamkheda ZP Election Result 2026 Younger Brothers Wife Asha Bhise Defeated Elder Brothers Wife Sarita Bhise By 2 Votes


लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत कामखेडा जिल्हा परिषद गटाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर निकाल समोर आला आहे. हा निकाल लढत किती चुरशीची होती ते स्पष्ट करणारा आहे. इथे धाकट्या जाऊबाईकडून थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव करण्यात आला आहे.

Latur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद यांचा मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल लागताना दिसत आहेत. या जिल्हा परिषद निवडणूक लातूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी काँग्रेस निवडून येताना दिसत आहे. काही ठिकाणी अत्यंच चुरशीच्या लढती बघायला मिळत आहेत. तिथला निकाल हा अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाचा निकालदेखील तसाच समोर आला आहे. इथे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या दोन्ही बंधूंच्या पत्नी या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये अवघ्या दोन मतांनी काँग्रेसच्या तिकिटावर आपलं नशिब आजमावणाऱ्या आशा भिसे यांचा विजय झाला आहे.

लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषदेमध्ये अटीतटीची लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांच्या मोठ्या जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी 52 जागांचे निकाल लागले आहेत, ज्यात काँग्रेस हा 19 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर भाजपला 17 जागांवर विजय मिळाला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला एक आणि 2 अपक्ष विजयी झाले आहेत.

काँग्रेस सर्वात जास्त जागेवर विजयी

लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता असली तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचू शकते. विजयी झालेले 2 अपक्ष कोणती भूमिका घेणार? यावरही सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.

लातूर जिल्ह्यातील इतर निकाल कसा?

लातूरच्या उदगीर तालुक्यातील निडेबन, तोगरी आणि हेर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. वाढवना, सोमनाथपूर येथे भाजपचे उमेदवार जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार लोहारा आणि नळगीर जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा