Juhu Beach: मागील १० दिवसांत घनकचरा व्यवस्थापन विभागाने इथे एक हजार ८०० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

जुलैच्या सुरुवातीच्या काळात एक हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने लहान नाले आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून गेला होता. भरतीच्या लाटांमुळे हाच कचरा किनाऱ्यांवर येत असून, यामुळे स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. सुमारे सात किलोमीटरच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर सध्या दररोज जवळपास ३५० मेट्रिक टन कचरा वाहून येत आहे. त्यामुळे महापालिकेला येथे कचरासंकलन व विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत ठेवावी लागत आहे. याद्वारे रोज सुमारे १८० मेट्रिक टन कचरा हटवण्यात येत आहे.
Mumbai Concert Tragedy: ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा ड्रग्जनेच गेलेला जीव; वरळीतील घटनेबाबत प्रयोगशाळेचा निष्कर्ष
आव्हानात्मक हवामानातही समुद्रकिनारा स्वच्छ, सुरक्षित आणि खुला ठेवण्यासाठी महापालिकेने मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर तैनात केली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्याच्या देखभालीसाठी एरवी दोन बीच क्लिनिंग मशिन, १० डंपर, एक जेसीबी आणि दोन सत्रांमध्ये कार्यरत १५० स्वच्छता कर्मचारी असतात. मात्र, यंदा कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने महापालिकेने नेहमीच्या यंत्रणेसोबत अतिरिक्त स्वरूपात एक बीच क्लिनिंग मशिन, पाच डंपर, एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर ट्रॉली, दोन पोकलेन मशिन आणि दोन सत्रांमध्ये ९० अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे कचरा हटवण्याच्या कामाला अधिक वेग मिळाल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी केला.
Delimitation Bill: …तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान
श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
मागील काही दिवसांपासून जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या कचऱ्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांतून समोर येत आहेत, तर प्रसारमाध्यमांतही यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी सकाळी या किनाऱ्यावर भेट देऊन पाहणी केली. ‘जुहू किनाऱ्यावर कचऱ्याचे दोन ते तीन फुटांचे ढीग जमले आहेत. नाल्यातील – कचरा वेळेत साफ न झाल्यामुळे तो थेट समुद्रात जाऊन मिळत आहे. ही केवळ महापालिकेच्या निष्क्रीय कारभाराची शोकांतिका आहे. याची दखल घेत चौकशी करून महापालिकेने तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी’, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

