Amalner Three Children Drown and Death : अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.

सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला
हे तिघं काल मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता खाण परिसरात गेले होते. तेथे बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्यावर चढले. सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने त्याचा हात धरला; मात्र, तोही खाली जाऊ लागला, म्हणून त्याने तिसऱ्याचा हात धरला. मात्र, तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल करून पोलिसांना माहिती दिली.
Mumbai Crime : कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे
स्थानिक नागरिक आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांच्यासह इतर घटनास्थळी पोहचले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दिनेश हा अकरावी कॉमर्सला, तर मानव आणि कार्तिक नववीत शिकत होते. घटनेमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली होती.
ढगफुटी नव्हे मुसळधार
ढगांच्या भोवऱ्याने दिशा बदलल्याने हवामान विभागाने वर्तविलेली ढगफुटी टळली असली तरी इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्याला मंगळवारी अतिवृष्टीने झोडपून काढले. इगतपुरीत २४ तासांत २०० मिमी, सुरगाण्यात १४९ तर त्र्यंबकेश्वरमध्ये २४ तासांमध्ये १२९.४ मिमी पावसाची नोंद झाली. हंगामातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
Pune Traffic: पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद, कोणत्या वाहनांना शहरात प्रवेशबंदी?
पर्यटन स्थळांवर जाण्यास १३ जुलैपर्यंत बंदी
शहरात मागील २४ तासांत ८४ मिमी, तर मंगळवारी दिवसभरात २३.७ मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर कायम असल्याने आज, बुधवारीदेखील पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनिवासी शाळांमधील सातवीपर्यंतच्या वर्गांना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्व पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास १३ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. संततधारेमुळे गोदावरीसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, रामकुंड परिसरातील काही लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री १ हजार ६१४ क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी २१ हजार ९६५ क्युसेक करण्यात आला.

